संभाजी ब्रिगेडची पुणे जिल्हाची नूतन जंम्बो कार्यकारणी जाहिर
शाहू महाराजांना संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने अभिवादन !
निर्भीडसत्ता न्यूज –
महाराष्ट्र हा महापुरुषांचा, समाजाला दिशा देणा-या समाजसुधरकांचा आहे. आजपर्यंत शिवरायांसारखा इतिहास कोणी घडवू शकलेला नाही. त्यामुळे आपण या महाराष्ट्राच्या इतिहासातून बोध घेतला पाहिजे, असे मत संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष आणि जेष्ठ विचारवंत अमरजीत पाटील यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड संघटनेचे संपूर्ण पुणे जिल्यात काम सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने आज शनिवारी (दि. 23) चिंचवड येथील शाहुनगर पिरॅमिड हॉल इथे जाहिर मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या महापुरुषांना पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आलं.
कार्याध्यक्ष अमरजीत पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, मुख्य समन्वयक शांताराम (बापू) कुंजीर, संघटक रमेशअण्णा हांडे, पिंपरी चिंचवड महापलिकेचे सहआयुक्त अण्णा बोदडे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडची नुतन कार्यकारणी जाहिर करण्यात आली असुन जिल्हाअध्यक्ष विशाल तुळवे यांच्या हस्ते पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील महत्वाची पद नियुक्ती करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकार्यांना निवडीचे पत्र या वेळी देण्यात आले.
संघटनेचे कार्याध्यक्ष आणि जेष्ठ विचारवंत अमरजीत पाटील यावेळी म्हणाले की, मेंदूच्या टिप-या उडाल्या पाहिजेत. ऐवढी ताकद ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. शिवजयंती साजरी करणे हे प्रत्येक भक्ताचे कर्तव्य आहे. शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांना यायचे नसल्यास, नको येवू द्यात. आम्ही तिथे शिवजयंती साजरी करू. इतिहासातून बोध घेतला पाहिजे. आजपर्यंत शिवरायांसारखा इतिहास कोणी घडवू शकलेला नाही. महाराष्ट्र हा महापुरुषांचा आहे. आज लग्न सोहळ्यात मावळ्यांची पगडी घालून स्वागताला उभे केले जाते. समारंभात जेवण वाढतात. पण, ते वाढायचे असल्यास पुणेरी पगडी घालून वाढा. मावळ्यांचे हे होणारे विकृतीकरण थांबले पाहिजे. वाचत नाही, तोपर्यंत तुम्ही वाचत नाही. राज्यात, देशात परस्थिती वाईट आहे. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांची हत्या झाली. 30 वर्षे उलटली, तरी पुण्यात महात्मा फुलेंचा पुतळा बसवू शकले नाहीत. सत्यशोधक समाजाचा विस्तार संभाजी ब्रिगेडने केला. पुरंदरेंना कितीही सन्मान देवू द्या. आपण छत्रपती शाहू महाराजांचे कर्तृत्त्व घरोघरी पोहचविले पाहिजे. सार्वजनिक विज्ञानाचा वापर झाला पाहिजे. उद्योगाच्या क्षेत्रात पुढे गेले पाहिजे. अनेक क्षेत्रात बाहेरच्या देशात संधी आहेत. फुले, शाहू, आंबेडकर, भाऊराव पाटलांची विचारधारा पुढे चालविली पाहिजे.
पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे म्हणाले की, आजचा समाज विस्कटलेला आहे. संतांची आणि समाज सुधारकांची भूमी असलेल्या महाराष्ट्राने नेहमीच सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला आहे. राजर्षि शाहू महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समता, संघर्षाचा झंझावात महाराष्ट्रातून सुरू होऊन त्याने देश व्यापला गेला आहे. सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, सहकार अशा विविध क्षेत्रात चौफेर प्रगती करणारा महाराष्ट्र हा देशासाठी नेहमीच आदर्श उदाहरण ठरला आहे. म्हणून खऱ्या अर्थाने संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांचे योगदान महत्वाचे आहे.
दरम्यान अण्णा बोदडे, शिवश्री डावकर, प्रमोद गोतारने, गणेश दहिभाते, संजय वाजगे यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्त्यांनी मोठ्या संखेने सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, सूत्रसंचालन विजय बोत्रे, आभार सुधीर पुंडे यांनी मानले.
संभाजी ब्रिगेडची पुणे जिल्हा, तालुका जाहिर करण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे…
शिवश्री डावखर (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशिक्षण), शिवश्री दहिभाते (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष उपक्रम), प्रमोद गोतारणे (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशासन), विशाल जरे (पुणे जिल्हा सचिव), संजय वाजगे (पुणे जिल्हा उपाध्यक्ष जुन्नर), विनायक सावंत (पुणे जिल्हा उपाध्यक्ष मावळ), सोमनाथ गोडसे (पुणे जिल्हा संघटक), स्वप्नील तांबे (आंबेगाव तालुका अध्यक्ष), शिवाजी बोत्रे (जिल्हा संघटक), अविनाश करंजे( जिल्हा संघटक), गणेश गारगोटे (खेड तालुकाध्यक्ष), निलेश कंधारे (मावळ तालुकाध्यक्ष), अजिनाथ मालपोटे (मावळ तालुका कार्याध्यक्ष, नामदेव पवार (जिल्हा संघटक जुन्नर तालुका), बापुसाहेब कांबळे (जिल्हा संघटक मावळ तालुका), संतोष सोनवणे (खेड तालुका संघटक)