निर्भीडसत्ता न्यूज –
नवी दिल्ली : सहलीसाठी महाबळेश्वरला निघालेल्या दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस काल आंबेनळी घाटात 600 फूट खोल दरीत बस कोसळून झालेल्या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 25 जणांचे मृतदेह बचाव पथकाने बाहेर काढले आहेत.
दरम्यान, या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे. रायगडमधल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचं मला दुःख आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.