निर्भीडसत्ता न्यूज –
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीचे आज (गुरुवार) आळंदीतील इंद्रायणी नदीत अस्थी कलशाचे विसर्जन करण्यात आले.
शांतिब्रम्ह मारोतीबुवा महाराज कुरेकर,सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे,पालकमंत्री गिरीष बापट,खासदार अनिल शिरोळे,भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संजय उर्फ बाळा भेगडे,आमदार महेश लांडगे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, खेडचे प्रांत आयुष प्रसाद,आळंदीचे मंडलाधिकारी चेतन चासकर,पुणे शहर भाजपचे अध्यक्ष योगेश गोगावले,माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले,संजय घुंडरे,मंडूबाबा पालवे,दत्तात्रय काळे,विविध पक्षाचे आजी,माजी पदाधिकारी , वारकरी विद्यार्थी उपस्थित होते.
आळंदीत अस्थी कलश इंद्रायणी नदीवर आणण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले. इंद्रायणी नदी घाटावर पालकमंत्री गिरीश बापट यांचे हस्ते अस्थींची पूजा झाल्यानंतर श्रद्धांजली आणि अस्थिवर पुष्प अर्पण उपस्थितांनी केली. पसायदान झाल्यानंतर भारतरत्न अटलजी वाजपेयी यांचे अस्थींचे इंद्रायणी नदीत परंपरांचे पालन करीत विसर्जन करण्यात आले.