निर्भीडसत्ता न्यूज –
भाजपच्या पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रथम मासिक पुण्यस्मरणा निमित्त काव्यांजली कविसंमेलन मोरवाडी येथील भाजपा कार्यालयात घेण्यात आले. अटलजी यांनी लिहिलेल्या कवितांचे अभिवाचन शहरातील मान्यवर कवींनी केले.
आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आर एस कुमार यांनी अटलजी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून काव्यांजली अर्पण करण्यात आली. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ कवी सुरेश कंक होते , तर प्रमुख पाहुणे भाजपा दक्षिण भारतिय अघाडीचे प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले होते.
मौतसे ठन गयी, जुझनेका मेरा इरादा न था ही अटलजीची कविता उज्वला केळकर यांनी वाचन केली.अगणित बलिदानोसे अर्जित ये स्वतंत्रता ही कविता राज अहेरराव यांनी सादर केली.हरी हरी दुबपर ओस की बुंदे अभी थी अभी नही थी या अटलजींच्या कवितेचे वाचन मधूश्री ओव्हाळ यांनी केले . भारत जमीनका तुकडा नही जीता जागता राष्ट्रपुरुष है, ही कविता सुहास घुमरे यांनी सादर केली.
कवी राजेंद्र धावटे, शोभा जोशी, अंतर देशपांडे, शरद शेजवळ, विनिता माने यांनी अटलजींच्या कवितांचे वाचन केले. कार्यक्रमाच्या संयोजनात संजय परळीकर, आझाद शेख व संजीवनी पांड्ये यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालय सचिव रामकृष्ण राणे यांनी केले तर आभार नगरसेवक शीतल शिंदे यांनी मानले.