निर्भीडसत्ता न्यूज –
राज्यात सर्वत्र मोठ्या थाटामाटात व जल्लोषात गणेशमूर्ती विसर्जनाचा सोहळा सुरू असतानाच या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. गणेशविसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच राज्यात विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांत 24 जणांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जळगावला चार, तर जुन्नर व जालना येथे प्रत्येकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत भांडुप येथे गणपती विसजर्र्न करताना तराफ्याबरोबर गेलेल्या युवकाचा पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.त्यामुळे सुरू असलेल्या उत्साह व जल्लोषावर दुःखाचे सावट पडले.