25 वा राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सव
निर्भीडसत्ता न्यूज –
भक्ती शृंगारामध्ये बुडालेल्या माडगुळकरांनी मराठी साहित्यात मोठे योगदान दिले आहे. लावणी लिहिणारे गदिमा आणि गीत रामायण लिहिणारे गदिमा अशी विविध रूपे असलेला हा एकमेव कवी आहे. माणूस जोपर्यंत जिवंत असणार तोपर्यंत गीत रामायण राहणार आहे. गदिमांची प्रतिमा श्रोत्यांपर्यंत पोचवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी व गीत रामायणकार ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद व महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात 25 वा राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, स्वागताध्यक्ष सुदाम भोरे, गदिमांचे नातू सुमित माडगुळकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. स्वागताध्यक्ष सुदाम भोरे यांनी तर दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केेले.