मुंबई : कोरोनाची लाट रोखण्यासाठी अतिशय कठोर पावले उचलण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असून 45 वर्षांवरील सर्वांचे सरसकट लसीकरण करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नुकतीच केली.
कोरोना संक्रमणामुळे राज्याला पुन्हा लॉकडाउनचा मार्ग स्वीकारावा लागतो का काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ते नंदुबारमध्ये बोलत होते. ते म्हणाले, लॉकडाउनचा पर्याय समोर दिसत आहे. मात्र मला लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. लोक आता मास्क वापरु लागले आहेत,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.राज्यातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंर्त्यांनी केंद्राकडे केली.