पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरीत मुख्यमंत्री योगी यांच्या प्रतिमेस कॉंग्रेसने जोडे मारलेपिंपरी (दि. 4 ऑक्टोबर 2021) उत्तर प्रदेशच्या शेतकरी आंदोलनात वाहन घुसवून शेतक-यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मुख्यमंत्री योगी यांच्या सरकारने राजीनामा द्यावा आणि शेतक-यांची जाहिर माफी मागावी अशी मागणी कामगार नेते व इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली.
उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनात भाजपच्या मंत्री पुत्राने वाहन घातले. यामुळे काही शेतक-यांचा मृत्यू झाला. तर अनेक शेतकरी गंभीररित्या जखमी झाले. या शेतक-यांच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी जात असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पोलिस प्रशासनाने प्रियांका गांधी यांना बेकायदेशीररित्या अटक करुन कायद्याचे उल्लंघन केले आहे. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. 4 ऑक्टोबर) पिंपरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस, इंटक, युवक काँग्रेस, सेवादल व एनएसयुआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत मुख्यमंत्री योगी यांच्या प्रतिमेस जोडे मारले. यावेळी उत्तर प्रदेशातील भाजपा सरकार व केंद्रीतील मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पर्यावरण विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, एनएसयुआयचे शहराध्यक्ष डॉ. वसीम ईनामदार, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, उत्तरप्रदेश काँग्रेस सेवादलाचे महासचिव सलमान जब्बारअली, शहर एससी विभागाचे कार्याध्यक्ष विजय ओव्हाळ, सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष गणेश नांगरे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस रवी नांगरे, पिपंरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी युवक अध्यक्ष नासीर चौधरी, चिचंवड विधानसभा युवक उपाध्यक्ष सौरभ शिंदे, अलोक लाड, विशाल सरोदे, अनिल सोनकांबळे, प्रकाश पठारे, सचिन कदम, रहीम चौधरी, आसिफ शेख, तेजस पाटील, अमित मोरे आदींनी सहभाग घेतला होता.
यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, केंद्रात मोदी सरकार आल्यापासून सामान्य नागरिकांवर विशेषतः शेतकरी व कामगारांवर अन्याय केला आहे. नुकतेच भाजपाच्या मंत्र्याच्या मुलाने उत्तरप्रदेश मधील आंदोलक शेतक-यांना मोटारीने चिरडले त्यात काही शेतक-यांचा मृत्यू झाला. तर अनेक गंभीर जखमी झाले. अशी आंदोलने चिरडून देशात हुकूमशाही राजवट सुरु करण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे. या घटनेमुळे मोदी व योगी सरकारचा तसेच भाजपाचा खरा चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला आहे. प्रियांका गांधी यांना बेकायदेशीर करणे हे अत्यंत खेदजनक न संतापजनक आहे. या कृत्याने योगी सरकार हे प्रियांका गांधी यांना घाबरत असल्याचे दिसून येते. या प्रकरणास जबाबदार असलेल्या उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी डॉ. कैलास कदम यांनी केली.
निषेध नोंदवताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, केंद्र सरकारच्या चूकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारी वाढली आहे. या युवकांवर बेरोजगारीने आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तर दुस-या बाजूला शेतकरी आंदोलकांना वाहनांनी चिरडले जात आहे. अशा घटना यापुर्वी देशात कधी घडल्या नाहीत. प्रियांका गांधी यांना बेकायदेशीरपणे अडवून उत्तरप्रदेश पोलिसांनी स्वतः कायद्याचा भंग केला आहे. यालाच सत्तेचा गैर वापर व सत्तेची मस्ती म्हणतात. जनता आता या हुकूमशाहीचे सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी दुर्घटनेत मृत्यू मुखी पडलेल्या आंदोलक शेतकरी बांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अशोक मोरे, विश्वास गजरमल, उमेश खंदारे, वसीम ईनामदार, सलमान जब्बारअली यांनी ही निषेध व्यक्त केला.