भंडारा डोंगर | निर्भीडसत्ता न्यूज
मावळची भूमी ही भक्ती-शक्तीची परंपरा असणारी भूमी आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना जिथे अभंग सूचले. तुकोबारायांचे चिंतनस्थळ असणाºया भंडारा डोंगरावरील मंदिर जगाला प्रेरणा देईल, तेथील मंदिराच्या उभारणीसाठी सर्वांनी जमेल तशी मदत करावी, एक रूपया मदत करावी. मनभर नाही, मनापासून मदत करायला हवी. किलोने नाही देता आले तरी किमान गुंजभर सोनं द्यावे, तुकोबारायांच्या मंदिरासाठी हातभार लावावा, असे मत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी रविवारी भंडारा डोंगरावर व्यक्त केले. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीने भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराज यांचे मंदिर साकारले जात आहे. मंदिराचे काम सुरू आहे. त्यामुळे आज विशेष संकल्पसभेचे आयोजन केले होते.
यावेळी वारकरी संप्रदायभूषण शांतीब्रम्ह मारुतीबाबा कुºहेकर, एमआयटीचे डॉ. विश्वनाथ कराड, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार नाना नवले, उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी उल्हास पवार, न्यायमूर्ती मदनमहाराज गोसावी, बीव्हीजीचे हणमंत गायकवाड, आळंदी देवस्थानाचे डॉ. अभय टिळक, विकास ढगे, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार कमल किशोर कदम, कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे, बापू पठारे, डॉ. यु. म. पठाण, देहूदेवस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, एमआयटीचे राहूल कराड, शिवसेना नेते राहुल कलाटे, देहू देवस्थानाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब देहूकर, विजय बोत्रे, बापूसाहेब भेगडे, माजी महापौर संजोग वाघेरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, भाऊसाहेब भोईर, विक्रांत लांडे विश्वस्त मंडळ आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी प्रास्ताविकात मंदिर उभारणीची भूमिका सांगितली. मंदिराची माहिती दिली. तसेच मंदिराच्या उभारणीत मदत करणाºयांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.शांतीब्रम्ह मारूतीबुवा कुºहेकर म्हणाले, ‘‘भंडारा डोंगराचे विशेष स्थान आहे. जगाच्या उधार करण्यासाठी संत तुकाराम महाराजांचा गाथा निर्माण झाला. तो पाचवा वेद आहे. देहू हे तुकोबारायांचे जन्मास्थान असले तरी भंडारा डोंगर हे गाथेचे जन्मस्थान आहे. तिथे मंदिर उभारले जात आहे. ही आनंददायी बाब आहे.
उल्हास पवार म्हणाले, ‘‘संत तुकोबांनी आपल्याला जगण्याचे तत्वज्ञान दिले. या तीर्थक्षेत्राच्या विकासात योगदान देता आले ही भाग्याची गोष्ट आहे. गाथेच्या जन्मभूमीत मंदिर उभारले जात आहे. हा सुवर्ण पर्वत आहे. येथील मंदिर सुवर्णमय करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. सर्वांनी योगदान द्यावे.’’
विश्वनाथ कराड म्हणाले, ‘‘मंदिर उभारण्याचे धाडस वारकºयांनी दाखवले. हे ज्ञानाचे तीर्थक्षेत्र आहे. स्वत्व, स्वधर्म, ज्ञानधर्म वाढविण्याचे काम संतांनी केले आहे. येथील गाभाराही सुवर्णमय असावा. त्यामुळे मी माझ्या कुटुंबातर्फे गाभारा सुवर्णमय करण्यासाठी माझ्या कुटुंबियातर्फे सोन देतो.’’
खासदार बारणे म्हणाले, ‘‘संत तुकाराम महाराजांचे चिंतनस्थळ असणाºया भंडारा डोंगरावर मंदिर उभारले जात आहे. तुकोबारायांचे हे मंदिर जगाला प्रेरणा देणारे ठरणार आहे. नाना शिवले यांनी सूत्र संचालन केले. माजी आमदार कृष्णराव भेगडे आभार मानले.