सैनिक टाकळी | प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत कुरुंदवाड येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यासाठी आमदार उल्हासदादा पाटील यांचा शिरोळ तालुक्यातील मजरेवाड़ी, हेरवाड, टाकळीवाडी, नवे दानवाड, जुने दानवाड, सैनिक टाकळी,तेरवाड, राजापुरवाडी, उमळवाड, कोथळी, दानोळी, कवठेसार, तमदलगे, निमशिरगाव, जैनापुर, चिपरी या गावांचा संपर्क दौरा आज पूर्ण झाला. गावागावातून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद वाढत आहे. शेतकरी मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
उपजिल्हाप्रमुख़ मधुकर पाटील, जिल्हा संघटिका मंगलताई चव्हाण, संभाजी गोते, सदाशिव पाटील, नारायण पाटील उमेश पाटील कृष्णात पाटील, पांडुरंग पाटील, धौंडीराम पाटील, महादेव पाटील, अनिल पाटील काका पाटील, भरत पवार, सागर परीट, शिलेदारसर, संजय पाटिल, विजय नाईक, राजगोंड पाटील, धनपाल गुरव आदि सदस्य, शिवसैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
सैनिक टाकळी येथे माजी सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष बी.एस पाटील म्हणाले की, शिरोळ तालुक्यास उल्हास पाटील यांच्या रूपाने कार्यसम्राट आमदार मिळाला आहे. आमदार उल्हास पाटील यांच्या कारकिर्दिचा आलेख चढ़ता आहे. ते पक्षप्रमुखांचे लाडके आमदार आहेत. त्यांच्या यशामध्ये शिरोळ बरोबर टाकळीचाही सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे टाकळी गाव सदैव आमदार उल्हास पाटील यांच्या सोबत असेल.
आमदार उल्हास पाटील म्हणाले की, माझ्यावर प्रेम करणारी गावे आणि लोक हीच माझी ताकद आहे. टाकळी भागातील गावानी मला अधिक मताधिक्य दिले आहे. या शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित राहून बळ दयावे. आपले विचार, अडचणी, मागण्या माननीय शिवसेना पक्षप्रमुखांचे समोर मी मांडणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार उल्हास पाटील यांनी केले आहे.
यावेळी आमदार उल्हासदादा पाटील यांनी केलेल्या निःस्वार्थ कामाची पोहोच या मेळाव्याच्या गर्दीच्या रूपाने मिळणार आहे अशी प्रतिक्रिया चिपरी येथील बैठकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य सुरेश भाटिया यांनी व्यक्त केली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख ग्रामीण भागातील शेतक-यांशी संवाद साधन्यासाठी येत आहे. सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिरोळ तालुका प्रमुख सतीश मलमे यांनी केले.