किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
निर्भीडसत्ता न्यूज –
निर्भीडसत्ता न्यूज –
मोठ्या प्रमाणात नद्यांवर अतिक्रमणे केली जात आहेत. नद्या पृथ्वीच्या वाहिन्या असून जिवंत नद्या जिवंत जगाचे द्योतक आहेत. त्यासाठी नद्यांचे संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नदी वाचली, तर समाज आणि संस्कृती वाचेल, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चिंचवडमध्ये व्यक्त केले.
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गंत चिंचवडच्या जिजाऊ पर्यटन केंद्रामध्ये आयोजित ‘नदी संवर्धन व स्वच्छता’ कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी कर्नल सुरेश पाटील, रानजाई प्रकल्पाचे आबा मसुगडे, शैलजा देशपांडे, अश्विन परांजपे, शरद मांडे आदी उपस्थित होते.
महोत्सवाची सुरुवात राजू यांच्या सुरेल बासरी वादनाने झाली. त्यानंतर प्रख्यात चित्रकारांनी जलरंगाच्या माध्यमातून सुंदर चित्रे साकारली. त्यानंतर नदी संवर्धनाबाबतचे तीन लघुपट दाखविण्यात आले. पवना नदीविषयी पिंपरी-चिंचवड सिटिझन फोरमचे तुषार शिंदे यांनी गोडुंबरें येथील पवना नदी स्वच्छता व संवर्धनविषयक प्रकल्पाची माहिती दिली. तसेच, नदीविषयक रांगोळी प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, प्रख्यात चित्रकारांचे लाईव्ह पेंटिंग आणि पवना नदीविषयी यशोगाथा असे विविध कार्यक्रम झाले.
महोत्सवाची सुरुवात राजू यांच्या सुरेल बासरी वादनाने झाली. त्यानंतर प्रख्यात चित्रकारांनी जलरंगाच्या माध्यमातून सुंदर चित्रे साकारली. त्यानंतर नदी संवर्धनाबाबतचे तीन लघुपट दाखविण्यात आले. पवना नदीविषयी पिंपरी-चिंचवड सिटिझन फोरमचे तुषार शिंदे यांनी गोडुंबरें येथील पवना नदी स्वच्छता व संवर्धनविषयक प्रकल्पाची माहिती दिली. तसेच, नदीविषयक रांगोळी प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, प्रख्यात चित्रकारांचे लाईव्ह पेंटिंग आणि पवना नदीविषयी यशोगाथा असे विविध कार्यक्रम झाले.
कर्नल सुरेश पाटील म्हणाले, पर्यावरणाचा लढा हा मानवी न्यायाचा, समाजहिताचा आणि शाश्वत विकासाचा आहे. पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पातळीवर व्यापक विचार सुरू असून या क्षेत्रात काम करणा-यांनी निसर्ग संवर्धनासाठी समूहभान निर्माण करण्याची जबाबदारी पेलावी.
धनंजय शेडबाळे यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. सोमनाथ हरपुडे यांनी आभार मानले. मधुरा कुलकर्णी, ओंकार गिरीधर, सचिन काळभोर यांनी संयोजन केले.
धनंजय शेडबाळे यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. सोमनाथ हरपुडे यांनी आभार मानले. मधुरा कुलकर्णी, ओंकार गिरीधर, सचिन काळभोर यांनी संयोजन केले.