निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेकडे नागरिकांच्या तक्रारीसाठी वेबपोर्टल, एसएमएस, ई-मेल, लोकशाही दिन, मोबाईल अॅप, सारथी हेल्पलाईन आणि किऑस्क ही माध्यमे आहेत. नागरिकांना तक्रारी करण्यासाठी व्हॉट्सअॅप सुविधा २ नोव्हेंबर २०१७ पासून सुरू केली आहे. त्यासाठी ९९२२५०१४५० हा क्रमांक आहे. या सुविधेद्वारे आजअखेर फक्त ५४७ नागरीकांनी तक्रारी केल्या आहेत.
प्रथम तक्रार करताना नागरिकांना नाव व पत्ता नोंदवावा लागते. नंतर फोटोसह तक्रारी करता .येते. तक्रारीचे काम पुर्ण झाल्यानंतर पुन्हा संबधितांना संदेशाव्दारे कळविले जाते. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य माहीती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी केले. चार महिन्यांपासून ही सुविधा आहे, परंतु पालिकेकडून त्याची प्रसिध्दी होत नाही.