सैनिक टाकळी / प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
सैनिकांच्या मुळेच आपण व आपला देश सुरक्षित असून त्यांचा सन्मान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. याच बरोबर महिलांचे सबलीकरण होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन या कंपनीचे जनरल मॅनेजर व्ही सि. नित्यानंदम यांनी सैनिक टाकळी येथील मोफत शिलाई वाटप कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कर्नल विजयसिंह गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून १०९ टी ए बटालियनचे ले. कर्नल मिलन शिंदे, एक्ससाईज डिपार्टमेंट चे सुपरिटेंडेंट गणेश पाटील, कंपनीचे मॅनिफॅक्चर मॅनेजर नवेंदू तिवारी, असिस्टंट मॅनेजर संजय कदरे, सरपंच वंदना माळगे, टाकळी दत्तवाड व परिसरातील राजकिय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित होते.
गणेश पाटील पुढे म्हणाले की, भविष्यामध्येही सैनिकी गावासाठी सहकार्य करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. भवानीसिंह घोरपडे यांनी कंपनीचे आभार मानून गरीब होतकरू साठी नेहमीच सामाजिक भावनेतून काम करणार असल्याची ग्वाही दिली.
सामजिक कार्यकर्ते भवानीसिंह घोरपडे यांच्या प्रयत्नातून तसेच सैनिक समाज कल्याण मंडळ टाकळी व पेरनॉड रिकॉर्ड इंडिया या कंपनी कडुन सैनिक टाकळी व परिसरातील सुमारे १५० माजी सैनिक पत्नी व गरीब होतकरू महिलांना मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले.
यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे स्वागत सैनिक समाज कल्याण मंडळाचे अध्यक्ष ऑ ले. बी एस पाटील यांनी केले. आभार मंडळाचे सचिव ए वाय पाटील यांनी मानले.