निर्भीडसत्ता न्यूज –
कष्टकरी कामगारांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मजूर संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड येथील मलकापूर रोड येथे जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या जनंसपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद यांच्या हस्ते बुधवारी (दि.16) मोठ्या उत्साहात करण्यात आले. कष्टकरांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब मोरे यांच्याकडे देण्यात आली आहे.
जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मलकापुरचे नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, कराडचे उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, नगरसेवक सुनील काटकर, डॉ. महेश गुरव, हनुमंत पवार, नानासो एडगे, पाटन जिल्हा परिषदचे सदस्य आशीष आचरे, कराडचे माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र कोळी, शुभम काळे, देवराज देसाई, मयुर साळुंखे, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, उपाध्यक्ष भिवाजी वाटेकर, सचिव प्रवीण जाधव, सहसचिव पांडुरंग कदम, सर्जेराव कचरे, अशोक साळुंखे, सतिश कंटाळे, संदिप मधुरे, गोरक्ष दुबाले, संतोष जाधव, जुबेर शेख, ओमकार माने, समर्थ नाईकवडे, नागेश वनवटे आदी उपस्थित होते.
या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना कामगार नेते इरफान सय्यद म्हणाले, ”कृष्णा व कोयना या नद्यांच्या प्रतिसंगमावर वसलेले कराड हे शहर झपाट्याने विकसित झालेले शहर म्हणून ओळखले जात आहे. दळणवळणाच्या चांगल्या सुविधा असल्याने दिवसें-दिवस औद्योगिकीकरण वाढत आहे. स्मार्ट शहर होण्याकडे कराडची वाटचाल सुरु आहे. हा भाग साखरपट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक साखर कारखाने या भागात असून गुळाची मोठी बाजार पेठ आहे.
साखर कारखाने, बाजार पेठा व वाढते औद्योगिकीकरण यामध्ये कष्टकरी कामगारांना डावलून चालणार नाही. याचा विचार करून संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोरे यांनी कष्टकरी कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून साद घातली आहे. मोरे यांच्याकडून कामगार हिताचे कार्य घडत राहीन. याबाबत आपल्या मनात शंका नाही. महाराष्ट्र मजदूर संघटना प्रत्येकवेळी आपल्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार आहे. जिल्ह्यातील हजारो असंघटीत कामगारांना संघटित करून त्यांना न्याय हक्क मिळवून द्यावे”, अशी अपेक्षाही सय्यद यांनी व्यक्त केली.