निर्भीडसत्ता न्यूज –
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (30 मे) दुपारी एक वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य बोर्डाचे सचिव अशोक भोसले यांनी दिली.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
http://www.knowyourresult.com
www.rediff.com/exams
hscresult.mkcl.org
http://jagranjosh.com/results
www.bhaskar.com
गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये बारावीच्या निकालाबाबत तारखा फिरत होत्या. मात्र याला आता पूर्णविराम मिळाला असून राज्य मंडळाने अधिकृतरित्या जाहीर केल्याप्रमाणे बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात 15 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना तो करता येणार आहे. त्यासाठी अर्जाचा आवश्यक नमुना संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी तो डाऊनलोड करुन स्वयंसाक्षांकित गुणपत्रिकेच्या प्रतिसह विद्यार्थ्यांनी 31 मे ते 9 जून या कालावधीत तो अर्ज व शुल्क भरुन विभागीय मंडळाकडे सादर करायचा आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी आधी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे.