निर्भीडसत्ता न्यूज –
मराठा समाजाच्या आरक्षणबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील दहा महिन्यांच्या कालावधीत कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या सरकार विरोधात मोठा असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २९ जूनला तुळजापूरमध्ये जागरण गोंधळ घालून मराठा क्रांती मोर्चाचे दुसरे पर्व सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिली. पिंपरी येथे पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी पुढील सर्व आंदोलने गनिमी काव्याने करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
शरद काटकर, विवेक पाटील, संतोष सुर्याराव, विवेकानंद बाबर, महेश डोंगरे, योगेश पवार, रामेश्वर भुसारी, शरद जाधव, सुरेखा सांगळे, ज्ञानेश्वर गायकवाड, अंबादास कातुरे, ज्ञानेश्वर कवडे, वैभव शिंदे, राजेंद्र देवकर, किरण सुर्यवंशी, ज्ञानेश्वर भुसारे, अमित धाडगे, हेमंत बर्गे, बाबा शिंदे, विवेकानंद बाबर, संजय सावंत, अनिल शिंदे, तुषार आमकरख महेश राणे, चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.