रक्तदानाची नैतिक जबाबदारी समजून प्रत्येकानेरक्तदान करावे; खा. अमर साबळे यांचे आवाहन
निर्भीडसत्ता न्यूज –
कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज पडेल हे सांगता येत नाही. आपण आजही कृत्रीम रक्ताची निर्मिती करु शकलेलो नाही हे सत्य आहे, त्यासाठी ऐच्छिक रक्तदान आवश्यक आहे. सुरक्षित रक्त पुरवठयासाठी ऐच्छिक रक्तदानाची नैतिक जबाबदारी समजून प्रत्येकाने रक्तदान करावे. असे मत खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समितीचे सदस्य तथा वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य विलास मडिगेरी यांचा वाढदिवसानिमित्त भोसरीतील इंद्रायणी नगर, वैष्णोमाता प्रांगण येथे आयोजित कार्यक्रमात खासदार साबळे बोलत होते.
यावेळी रक्तदान शिबीराचे उदघाटन भोसरी पोलीस स्टेशन व एमआयडीसी पोलीस स्टेशन चे दोनही वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव व भिमराव शिंगाडे तसेच पीआय अजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक विलास मडिगेरी गेली 12 वर्षे असे सामाजिक उपक्रम राबवित असून स्वता: नगरसेवक मडिगेरी यांनी 61 वेळा रक्तदान केले आहे.
खासदार अमर साबळे, महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, नगरसेवक संतोष लोंढे, नामदेव ढाके, संदीप कस्पटे, उद्योजक महेश चांदगुडे, अमित गोरखे, शशिकांत कदम, बाबासाहेब त्रिभुवन, मोरेश्वर शेडगे नानासाहेब राऊत अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
खासदार अमर साबळे म्हणाले की, ज्या समाजाच आपण राहतो त्याच ऋण फ़ेडायची एक संधी रक्तदान आपल्याला मिळवुन देते. कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही. तुमच्यामुळे कोणाचा तरी जीव वाचण्यास मदत होते आहे, म्हणून रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे.
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल संचालित विश्वेश्वर ब्लडबँक व महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालय यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिरात 200 जणांनी सहभाग घेतला. दरम्यान यावेळी उद्योजक व्यंकटराव शिंदे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. महापालिकेच्या उद्यान विभागाचे मुख्य अधीक्षक सुरेश साळुंके यांच्या उपस्थितीत उपस्तीत 172 वृक्षलागवड करण्यात आली तसेच पांजरपोळ येथील अंध शाळेत निधी स्वरूपात मदत करण्यात आली. शांतीनगर आश्रम शाळेस अन्नदान, चिंचवड चाफेकर स्मारक समिती चे गुरुकुलम या शाळेत अन्नदान आणि दहावी, बारावीतील ६० टक्के पेक्ष्या जास्त विध्यार्थी अश्या ३४० गुणवंत विध्यर्थ्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्री. विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान आणि श्री साई चौक मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. कष्टाची तयारी असली आणि योग्य मार्गदर्शन मिळाले, तर हमखास विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करू शकतात.
एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते