निर्भीडसत्ता न्यूज –
मराठा आरक्षणावरून सुरू असलेले सकल मराठा समाजाचे आंदोलन हिंसक होत चालले असताना राज्यातील लोकप्रतिनिधी ही आपला पदाचा राजीनामा देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आहेत. या राजीनामा सत्राचे लोन आता ग्रामपंचायतीपर्यंत पोहचले असून हिंजवडी आयटी नगरी जवळील माण ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणी विद्यमान सदस्य संदीप साठे यांनी सुद्धा मराठा आंदोलनाच्या समर्थनार्थ आपला राजीनामा दिला आहे.
मराठा समाजाने लाखोच्या संख्येत तब्बल 58 मोर्चे शांततेत काढले. या शिस्तबद्ध आणी संयमात काढलेल्या मोर्चाची दखल संपुर्ण जगाने घेतली मात्र राज्य शासनाला याचे गांभिर्य समजले नाही. आता आंदोलन हिंसक बनत चालले असून मराठा समाजाचा संयम संपत चालला आहे. याला राज्यातील सरकार जबाबदार असून आंदोलन हातळन्यात सर्वच पातळीवर सरकार अपयशी ठरले आहे . याचा निषेध म्हणून मि ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजनामा देत आहे, असे संदीप साठे यांनी सांगीतले. तसेच ज्या बांधवांच्या मतावर मि लोकशाही मार्गाने निवडून आलो आहे. त्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल आणी आंदोलन करूण सुद्धा फरफट होणार असेल तर मला कसल्याही पदावर राहण्याचा नैतीक अधिकार नाही. त्यामुळे मि ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजनामा देत आहे, असे साठे यांनी सांगीतले तसेच मराठा समाजाच्या तिव्र भावना लक्षात घेऊन लोकसभा , विधानसभा , स्थानिक स्वराज्य संस्था मधील मराठा लोकप्रतिनिधींनी खुर्ची आणी पदापेक्षा मराठा समाज्याच्या भावना महत्वाच्या आहेत. याचे भान ठेऊन राजनामे देऊन मराठा समाज्याच्या मागे उभे रहावे, असे अवाहन संदीप साठे यांनी केले आहे.