निर्भीडसत्ता न्यूज –
राजकोट येथे भारत-विडिंज यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत पृथ्वी शॉने भारताच्या पहिल्या डावात १३४ धावांची खेळी केली. या १३४ धावांच्या खेळीत पृथ्वीने तब्बल १९ चौकार लगावले.भारताने पहिल्या दिवस अखेर, पहिल्या डावात ४ बाद ३६४ धावा केल्या आहेत.या दमदार कामगिरीनंतर पृथ्वी शॉवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबईतील त्याच्या घराशेजारी चाहत्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. पदार्पणाच्या कसोटीत पृथ्वीने केली गांगुली, सेहवाग आणि रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. अशी कामगिरी करणारा पृथ्वी जगातिल १०६ वा तर भारताचा १५ वा खेळाडू ठरला आहे.यापूर्वी भारताकडून १४ खेळाडूंनी पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याची किमया साधली आहे.या मध्ये लाला अमरनाथ, दिपक सोधन, क्रिपाल सिंग, अब्बास अली बेग, हनुमंत सिंग, गुंडप्पा विश्वनाथ, सुरिंदर अमरनाथ, मोहम्मद अझरुद्दीन, प्रविण आम्रे, सौरव गांगुली, वीरेद्र सेहवाग, सुरेश रैना, शिखर धवन आणि रोहीत शर्मा यांचा समावेश आहे.या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने सामन्यावर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे.
वीरेंद्र सेहवागने पृथ्वी शॉ ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या. अभिनंदन पृथ्वी शॉ, अभी तो बस शुरुआत है, लड़के में बहुत दम है”
It’s been the Shaw show. Congratulations Prithvi Shaw, abhi toh bas shuruaat hai , ladke mein bahut dum hai #IndvWI pic.twitter.com/obEcSylvCV
— Virender Sehwag (@virendersehwag) October 4, 2018