निर्भीडसत्ता न्यूज |
मावळचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी जाहीरपणे नवीन लोकल फेऱ्या सुरु केल्या असल्याच्या थापा मारल्या आहेत. वास्तविक दुपारी १२ ते ३ या वेळेत पुणे -लोणावळा आणि लोणावळा-पुणे दरम्यान एकही लोकल फेरी नाही. या पार्श्वभूमीवर लोकलने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची त्यांनी एका अर्थी ही क्रूर थट्टाच केल्याचे बोलले जात आहे.
मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी एका बॅनरद्वारे शहर गतिमान झाल्याचे सांगितले आहे. मात्र, सर्वसामान्य लोकल प्रवास करणाऱ्या मावळ तालुक्यातील प्रवाशांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. मुंबईत १४ डब्यांच्या लोकल गाड्या आल्या. पण लोणावळा आणि पुणेकरांना जुन्याच १२ डब्यांच्या लोकल गाड्यांमधूनच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. आमदार महोदयांनी दावा केलाय की आम्ही नव्या लोकल्स सुरु केल्या, नव्या मार्गिका केल्या. स्टेशन अत्याधुनिक केले.. एकदा त्यांनी या अस्वच्छ स्टेशनमध्ये फिरावे, म्हणजे त्यांना वास्तव कळेल, असे मावळमधील त्रस्त लोकल प्रवाशांचे म्हणणे आहे.
विद्यमान आमदारांनी नवीन लोकल फेऱ्या, नव्या मार्गिका, अत्याधुनिक स्टेशन्स सुरु केल्याच्या थापा मारून लोकल प्रवाशांची क्रूर थट्टाच केली आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.