मुंबई | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात शेती, जलसिंचनावर भर देण्यात आला आहे. यासोबतच महिलांसाठीही हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. यासोबतच पहिल्यांदाच अर्थसंकल्पात पर्यटनावर विशेष लक्ष दिल्याचं पाहायला मिळालं आहे. इतिहासात पहिल्यांदाच 1 हजार कोटीपेक्षा जास्त निधी पर्यटनाला दिल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे.
मुद्रांक शुल्कामध्ये असणार सवलत
राज्यातील पोषक वातावरणामुळे राज्यामध्ये मोठे उद्योग आले आहे. यासोबतच राज्यातील बांधकाम विभागाला चालना देण्यासाठी येत्या दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कामध्ये 1 टक्का सवलत देण्यात येईल. मुंबई, पुणे, नागपुरमध्ये ही सवलत लागू होणार आहे. यामुळे राज्याला 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावं लागणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
पेट्रोल-डिझेल दरवाढ
पेट्रोल डीजेलमध्ये 1 रुपया अतिरिक्त कर
बँकांसंदर्भात महत्त्वाची घोषणा
कुठल्याही खासगी बँकेत शासकीय निधी नसेल
महिला सुरक्षेसाठी सरकारची योजना
महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असणार आहे. महिला सुरक्षा हे सरकारचं प्राधान्य आहे. प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानक उभारलं जाणार आहे. यासोबतच प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोगाचं कार्यालय स्थापणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
शिवभोजन योजना
शिवभोजन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दुप्पट करण्याचे प्रस्तावित असून योजनेचा इष्टांक 1 लाख थाळी करण्यासाठी सन 2020-21 मध्ये 150 कोटींचे प्रत्सावित
शिक्षण विभागासाठी महत्त्वाच्या घोषणा
उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी 1300 कोटींचे प्रस्तावित
आरोग्य विभागासाठी महत्त्वाच्या घोषणा
सार्वजनिक प्राथमिक आरोग्य सेवेसाठी 5000 कोटी रुपयांचा प्रस्तावित
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर रक्कम
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महत्त्वाच्या घोषणा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जुन्या बसेस बदलून 1600 नवीन बस विकत घेम्यासाठी आणि बसस्थानके अत्याधुनिक करण्यासाठी 401 कोटींचे प्रस्तावित
ग्रामीण भागाच्या विकासासाठी ‘ग्रामीण सडक विकास योजना’
ग्रामीण भागातील रस्ते विकासाची 40,000 किमी लांबीची कामे हाती घेऊन 2020-24 या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन, यासाठी 1501 कोटी रुपयांचे प्रस्तावित
क्रिडा विभागासाठी महत्त्वाच्या घोषणा
ऑलिम्पिक स्पर्धांमधील राज्यातील खेळाडूंच्या उत्तम कामगिरीकरिता पुणे येथे ऑलिम्पिक भवन बांधण्याचे प्रत्सावित
रोजगार सुविधांबाबत महत्त्वाच्या घोषणा
राज्यातील युवक-युवतींना आत्मनिर्भर करण्यासाठी, रोजगार आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ राज्यात राबवणार, राज्यातील 80 टक्के नोकऱ्या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार
वरळीत पर्यटन संकुल उभारणार
वरळीत पर्यटन संकुल उभारण्यात येणार आहे. तसंच वन विभागासाठी 1630 कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त पर्यावरण विभागासाठी २३० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यटन स्थळी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
मराठी भाषा
कर्नाटकता मराठी भाषा जोपासणाऱ्या शाळांना 10 कोटींची तरतूद, तसेच मराठी दैनिकांना अनुदान
मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी मुंबईत मराठी भाषा भवन बांधणार
मराठवाडा वॉटर ग्रीडयोजना सुरू राहणार
पाणीपुरवठा विभागासाठी 2043 कोटींचे प्रस्तावित