पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
इंडीया ट्रेक संस्थेच्या वतीने सायकल फेरीतून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. संस्थेचे सर्वेश धुमाळ यांनी निगडी ते राजगड हा प्रवास सायकलवर केला. निगडी येथून शुक्रवारी (दि.19) पहाटे पाचला प्र्रवासाला सुरूवात केली. एकूण 80 किलोमीटर कापून ते सकाळी नऊला राजगडाच्या पायथ्याला पोहचले. अर्धातास विश्रांती घेवून साडेनऊला त्यांनी राजगडाची चढाई सुरु केली. गडावर पोहचल्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याचे औक्षण करुन दर्शन घेतले.
दरम्यान, कोरोना महामारीसोबत मुकाबला करण्यासाठी फिटनेस टिकवणे काळाची गरज आहे. फिटनेस महत्व समाजाला समजण्यासाठी सायकल फेरीचे आयोजन केल्याचे धुमाळ यांनी सांगितले.