देशाला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाले तरी, येथील भांडवलदार आपल्यावर राज्य करतील, हे वीर भगतसिंग यांचे ते विधान आज तंतोतंत खरे ठरत आहे. आज इथला खूप मोठा वर्ग भांडवलदारांच्या चाकरीत अडकला आहे. भांडवलदारांच्या पाठबळावर निवडून दिलेली सरकार पाडले जात आहेत. काही मीडिया कंपन्या भांडवलदार झाले आहेत. युवकांना नकली राष्ट्रभक्तीमध्ये गुंतवण्यात येत आहे. युवकांना धर्मांध बनवले जात आहे. जातीपातीत विष कालवले जात आहे. देश भांडवलादाराच्या चाकरीतून सोडवूयात, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली. शेख यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी सरचिटणिस दिपक गुप्ता, अनुज देशमुख, सचिव ओम क्षिरसागर, अनिकेत आवारे, मेंनेजमेंट सेलचे शहराध्यक्ष अकबर मुल्ला, अपंग सेलचे शहराध्यक्ष अशोक कुंभार, सुधाकर कांबळे, नागेश काळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक गायकवाड, सुनीता काळे, धनाजी तांबे, सुनील आडागळे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले