निर्भीड न्यूज –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार सर्वांनी आचरण केल्यास देशाचा उध्दार होईल. त्यासाठी तरुणांनी बाबासाहेबांचे विचार आचणात आणले पाहिजे, असे मत भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मारुती कदम यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी अर्थात 125 व्या जयंतीनिमित्त काळेवाडी येथील तापकीरनगर चौकात अभिवादन करण्यात आले. हिंद मजदूर किसान पंचायत आणि देशभक्त क्रांतिकारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
काळेवाडी येथील तापकीर चौकातील साई मंदिर ट्रस्टचे संस्थापक परशुराम नखाते, हिंद मजदूर पंयाचतचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि देशभक्त क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष कदम, शामराव वाकोडे, कन्हैया पवार, कौसर सय्यद, महेंद्र भोरे, दीपक इंगळे, आकाश कदम, अविनाश इंगळे, दिनेश कांबळे, सुरज वाघमारे आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रणालीनुसार जयंती साजरी करण्यात आली. संतोष कदम यांनी प्रास्ताविक केले. शामराव वाकोडे यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश इंगळे यांनी आभार मानले.