निर्भीडसत्ता न्यूज –
टी२० मुंबई लीग ही स्पर्धा मुंबईकर युवा खेळाडूंसाठी खूप मोठी संधी असेल. माझ्या मते ‘आयपीएल’साठी युवा खेळाडूंकरिता ही स्पर्धा पहिले पाऊल असेल असे मत गुरुवारी भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने व्यक्त केले.
गुरुवारी मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) बहुचर्चित ‘टी२० मुंबई लीग’ क्रिकेट स्पर्धेची घोषणा केली. तसेच स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अभिनेता सैफ अली खान याच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कांबळीने म्हटले आहे की, टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तिथले वातावरण वेगवान गोलंदाजीसाठी पूरक असून आपला संघ मजबूत फलंदाजीच्या जोरावर चांगली कामगिरी करेल असा विश्वास आहे. या वेळी विनोद कांबळीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.