हेरवाड/ प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
हरवलेल्या वस्तू प्रामाणिकपणाने आणून देणारी माणसं पैशाच्या लोभात हरवलेली आहेत़ त्यामुळे माणसाची कष्ट करण्याची वृत्ती नष्ट होत चालली आहे़., अशा युगात प्रामाणिपणाने काम करणारी माणसे हरवत चालली आहेत़. मात्र, हेरवाड येथील रिक्षाचालक शौकत विजापूर यांनी आपल्या रिक्षात प्रवाशांचे सापडलेले सहा तोळ्याचे दागिणे परत करुन आपला प्रामाणिकपणा दाखवून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
रिक्षा चालवून पोट भरणारे शौकतभाई हे गावातील सर्वांच्या परिचयाचे आहेत़ आपले काम ते प्रामाणिकपणे बजावत आहेत़ त्यांची रिक्षा हेरवाड-कुरुंदवाड मार्गावर धावते़ दिवसभर प्रवाशांना ने-आण करुन त्यांनी प्रवशांची सेवा आजही नित्यनियमाने बजावत आहेत़ प्रवाशांना ने-आण करताना त्यांची असलेली भाषाशैली, आदर यामुळे प्रवाशांच्या मनात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे.
शौकतभाई दिनक्रमाने आपली रिक्षा घेवून जात होते़, त्यावेळी त्यांनी प्रवाशांना सोडून गाडी पार्कींग करत असताना त्यांच्या गाडीत सोन्याचे दागिणे निदर्शनास आले़ त्यांनी तातडीने गाडीतील प्रवाशांची चौकशी करुन त्यांनी सहा तोळ्याचे दागिणे परत देवून आपला प्राणिकपणा दाखविला़ आहे.
मंगल माळी व कुमार बाळगोंडा पाटील या प्रवाशांचे दागिणे होते़ या प्रामाणिकतेबद्दल शिरोळचे उपसरपंच पृथ्वीराज यादव, हेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील, गटनेते आऱबी़पाटील, उपसरपंच देवगोंडा आलासे, सुधीर माळी संजय पुजारी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला़. त्यामुळे परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे.