निर्भीडसत्ता न्यूज –
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ पवनामाई’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाला तीन महिने पूर्ण झाली आहेत. आज (रविवार, दि. 4 फेब्रुवारी) रोजी हे जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई अभियान रावेत बंधारा येथे राबविण्यात आले. या मोहिमेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
रावेत बंधारा येथे राबविण्यात आलेल्या जलपर्णी मुक्त स्वच्छ पवनामाई अभियानात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त दिलीप गावडे, ब प्रभाग सहायक आयुक्त संदीप खोत, देश का सच्चा हिरो असे नरेंद्र मोदी यांनी गौरविलेले चंद्रकात राधाबाई दामोदर कुलकर्णी, नॉवेल इन्स्टिट्यूटचे अमित गोरखे, ग्रीनोवेशनचे हेमंत गावंडे, जलबिरादरीचे नरेंद्रभाई चुग, नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्यासह परिसरातील पर्यावरणप्रेमी व समाजसेवक तसेच शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.
यावेळी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष रो. प्रदीप वाल्हेकर, सचिव रो. दीपक वाल्हेकर, प्रकल्पाधिकारी रो. मयूर वाल्हेकर, सीएसआर डायरेक्टर जगन्नाथ फडतरे, फंड रेझिंग डायरेक्टर रो. सोमनाथ हरपुडे, रो. मारुती उत्तेकर, रो. शेखर चिंचवडे, रो. राजेंद्र चिंचवडे, रो. सचिन काळभोर, रो. गणेश बोरा, रो. सुनिल कवडे, रो. सुनिल वाल्हेकर, रो.चिंतामणी सोंडकर, रो. सुधीर मरळ, रो.वीरेंद्र केळकर, रो. युवराज वाल्हेकर, रो. संदिप वाल्हेकर, रो. अनिल नेवाळे व सर्व रोटरी सदस्य सहकुटुंब अभियानात सहभागी झाले. तसेच पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, पर्यावरण संवर्धन समिती, वृक्षवल्ली, सावरकर मित्र मंडळ, शेखर चिंचवडे युथ फाऊडेशन, एसकेएफ कंपनी एम्प्लॉयर्स ग्रुप, हरिष मोरे मित्र परिवार, संस्कार प्रतीष्टान, लेवा शक्ती महिला बचत गट, अमित मोगातरो, चाळीस मजूर असा मोठा पर्यावरणप्रेमींचा फौजफाटा नदी स्वच्छतेसाठी एकवटला.
अंजली भागवत पुढे म्हणाल्या की, “सौंदर्याने नटलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचे सौंदर्य टिकवणे आपल्या हातात आहे. आपण समाजाचा घटक म्हणून, माझ्या स्वतःसाठी हे पर्यावरण आहे असे समजून ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ पवनामाई’ अशा अभियानांमध्ये सहभागी व्हायला हवे. प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर पर्यावरण स्वच्छतेची सुरुवात केली, तर पिंपरी-चिंचवड शहर देशात अग्रेसर राहील. असे म्हणत त्यांनी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या या अभियानाचे कौतुकही केले.
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष रो. प्रदीप वाल्हेकर यांनी अभियानातील 92 दिवसांच्या प्रवासाविषयी सविस्तर माहिती दिली. रानजाई प्रकल्पाचे सोमनाथ मुसुडगे यांनी जलपर्णीच्या वाढीविषयी व निर्मुलनाविषयी माहिती सांगितली. सर्वांनी मिळून पाच ट्रक जलपर्णी बाहेर काढली. रो. सुनील कवडे यांनी लग्नाच्या तेविसाव्या वाढदिवसानिमित्त या स्वच्छता अभियानाला आर्थिक मदत केली. हेमंत गावांदे यांनी पाच हजार रुपये तर सचिन खोले यांनी एक हजार एक रुपयांची देणगी दिली.
पुढील आठवडाभर रावेत पासून ते दापोडी पर्यंतची जलपर्णी काढण्यात येणार आहे. सोमवार (दि. 12) रोजी अभियानाच्या 100 व्या दिवशी रावेत बंधारा येथे हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात शहरातील निसर्गप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे प्रकल्पाधिकारी मयूर वाल्हेकर यांनी केले आहे.