निर्भीडसत्ता न्यूज –
कंगणा रणावत या महिन्याच्या अखेरपर्यंत विवाहबद्ध होणार आहे. एका समारंभादरम्यान तिला पत्रकारांनी तिच्या लग्नाविषयी छेडले असता, तिने स्वतःच हे उत्तर दिले आहे. कंगणा स्वतःला बॉलिवूडच्या व्यवसायामध्ये अगदी व्यवसायिक अभिनेत्री मानती आहे. तसेच करण जोहरबरोबरचे तिचे भांडण अगदीच काल्पनिक आहे.गेल्या वर्षी कंगणाने करण जोहरवर बॉलिवूडमध्ये वशिलेबाजी आणल्याचा आरोप केला होता. त्यावरून दोघांमध्ये दीर्घकाळ शीतयुद्ध सुरू होते. मात्र गेल्याच महिन्यात कंगणा आणि करण जोहर एका कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यामुळे तो वाद आता संपला आहे, असे ती मानते. मात्र तरिही लग्नाचा मुद्दा शिल्लक राहतोच. त्यावर “मला फेब्रुवारीपर्यंतचा वेळ द्या.’ असे ती पत्रकारांना म्हणाली. अपल्या मनात कोणाही बाबत कोणताही आकस नाही.