निर्भीडसत्ता न्यूज –
भाजपकडून कच-याच्या समस्येकडे लक्ष दिले जात नाही, तसेच दलितांवरील वाढलेल्या अत्याच्याराच्या मुद्द्यामुळे भाजपपासून या पुढील राजकीय कारकीर्दीत अलिप्त राहण्याचा निर्णय नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी घेतला. त्याबद्दल त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बळी देऊन व्यवस्था मोठी चूक करतेय. एकाचा आवाज दाबला तर अनेक आवाज येतील. अध:पतन म्हणतात ते हेच. भिणार नाही लढणार भीमकोरेगाव दंगल,अॅट्रॉसिटी कायद्यातील बदल आणि अनेक राज्यांमध्ये वाढलेल्या दलित अत्याचारांच्या घटनांमुळे आज देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे भाजपच्या पापाचे भागीदार व्हायचं नाही अशी योग्य भुमिका घेऊन समाजासाठी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली आहे. त्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाकडून नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांचा नुकताच पिंपरी येथिल विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारका येथे जाहिर सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुप संस्थापक अध्यक्ष सतीश कदम, रयत विद्यार्थी विचार मंचाचे अध्यक्ष धम्मराज साळवे, महासचिव संतोष शिंदे, ब्लू पँथरचे सनी पवार, अतुल क्षिरसागर, ग्राहक हक्क समितीचे अमोल उबाळे, रविंद्र सावळे, अमित भालेराव, अंजना गायकवाड, अनिता सावळे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.