निर्भीडसत्ता न्यूज –
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने टाटा मोटर्सने राज्य सरकारच्या सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांमध्ये 1000 विद्युत वाहने समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाबरोबर एक सामंजस्य करार केला आहे. टाटा समूहातील टाटा पॉवर लि. व टाटा मोटर्स या कंपन्याच्या सहकार्यातून मुंबईत ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत. या करारामुळे पर्यावरणपुरक विद्यूत वाहनांना चालना मिळणार असून महाराष्ट्र सरकारने अवलंबविलेल्या इलेक्ट्रिक व्हेईकल धोरणाला देखील प्रोत्साहन मिळणार आहे.
टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि दशव्यवस्थापकीय संचालक गुंटर बुटशेक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार केला. याशिवाय मुख्यमंत्र्याच्या हस्ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथुन 5 टिगॉर ईव्ही वाहनांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. टाटा मोटर्सने ही वाहने ईईएसएल (एनर्जी इफिशिअन्सी सव्र्हिसेस लि.) या निविदा प्रक्रियेचा भाग म्हणून सरकारला दिली आहेत.
या प्रसंगी टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक गुंटर बुटशेक म्हणाले की, “टाटा मोटर्स भारत सरकारच्या ई-मोबिलिटीच्या दृष्टीकोनासाठी प्रतिबध्द आहेत. आम्ही या प्रयत्नांसाठी महाराष्ट्र शासनासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. आमच्या कंपन्यांच्या माध्यमातून आम्ही पर्यावरणपूरक विद्यूत वाहने देण्यासाठी सज्ज आहोत. आमची प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांव्दारे अपेक्षा व भविष्यातील आवश्यकतांची पूर्तता करण्यास तयार आहेत. ईईएसएलच्या टेंडचा भाग म्हणून आम्ही अगोदरच 250 कारांचे उत्पादन पूर्ण केले आहे. दुस-या टप्प्यातील ऑर्डर्सची अंमलबजावणी सुरु केली आहे. महाराष्ट्रातर्फे ईईएसएलद्वारा आज 5 टीगॉर ईव्ही वाहनांचे वितरण करून एकप्रकारे ई-मोबिलिटीला प्रोत्साहन देण्याची सुरुवात आम्ही केली आहे. भारतीय ग्राहकांसाठी विद्युत वाहनांना जलद चालना देण्यासाठी आणि भारतासाठी एक उज्वल भविष्यकाळ निर्माण करण्यासाठी काम करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टाटा मोटर्सच्या भागीदारीत मुंबईत ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्याबाबत टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले की, “महाराष्ट्र ईव्ही सज्ज आणि हरित तंत्रज्ञान उपायांसह सरकारच्या महत्वकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत. त्यामुळे भारतामधील प्रदुषण कमी करण्यासाठी व दूषित पर्यावरण मुक्त ग्राहकांच्या भविष्य घडविण्यामध्ये टाटा मोटर्स सरकारसोबत आहे. आम्ही राज्याच्या विस्तारानुसार अनेक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसह महाराष्ट्रातील ग्राहकांना सहजसपणे कार्यक्षम व टिकाऊ तंत्रज्ञान उपलब्ध करून देवू