निर्भीडसत्ता न्यूज –
आरोग्य
डाएट करून अशक्तपणा, थकवा चक्कर आली असता.अतिसार, ओकाऱ्यांवर.उष्णतेमुळे लघवीस जळजळ, भाजल्यामुळे होणारा दाह कमी होण्यासाठी.तरूणींनी, स्त्रियांनी नारळ पाणी घेतल्यास त्यांचा वर्ण उजळतो व रंगात तजेलदारपणा येतो.कॅलशियमचे संतुलन राखता येते. नारळ पाण्याचा असा उपयोग होतो.लठ्ठपणा कमी करण्यासाठी जेवणापूर्वी आणि वजन वाढविण्यासाठी जेवणानंतर एक ग्लास नारळ पाण्याचा उपयोग करावा.मानवी शरीरास आवश्यक असणारी जीवनसत्वे खनिजे, प्रथिने आणि शर्करा नारळपाण्यातून मिळत असल्याने त्यातून शक्तीचा शरीराला त्वरित पुरवठा होतो.ऍसिडिटी, अल्सर, जळजळ, पित्तनाश, उष्माघात, मूत्रविकार यावरही नारळपाणी परिणामकारक ठरते.