निर्भाडसत्ता न्यूज –
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त “काव्यमित्र” संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये रयत विद्यार्थी विचार मंच संस्थापक अध्यक्ष धम्मराज नवनाथ साळवे यांच्या शैक्षणिक ,सामाजिक कार्याची दखल घेत या वर्षीचा “राष्ट्रीय युवा चेतना “पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेचे १८ वर्षांपासून हे कार्य सुरु आहे.
जेष्ठ लेखिका,कवयित्री,संगीत विशारद अनुजा कल्याणकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. धम्मराज साळवे यांनी उत्तम वक्ता,विद्यार्थी नेता अशी ओळख निर्माण करताना सामाजिक कार्यात सहभाग घेत रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. तसेच, व्यसनमुक्ती, संविधान जनसामान्यपर्यंत पोहचवणे आदी विषयावर काम करत आहेत.
यावेळी काव्यमित्र संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सगर, उपाध्यक्ष संजय जगताप,हरिनाथ कांबळे,संतोष शिंदे, अंजना गायकवाड, नीरज भालेराव , रोहित कांबळे, महेश गायकवाड, कासीम शेख, शशिकांत कुंभार आदींसह अनेकजण उपस्थित होते.