निर्भीड न्यूज –
ज्या समाजाच आपण राहतो त्याच ऋण फ़ेडायची एक संधी रक्तदान आपल्याला मिळवुन देते. खर तर हया दानामुळे आपल काहीच कमी होत नाही. तुमच्यामुळे कोणाचा तरी जीव वाचण्यास मदत होते आहे ही भावना खरच खुप सुखावणारी आहे म्हणून रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असे मत इंद्रायणी को ऑप बँकेचे चेअरमन आणि कार्यक्रमाचे उद्घाटक अॅड. एस. बी. चांडक यांनी व्यक्त केले.
अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या पिंपरी-चिंचवड महानगर शाखेतर्फे रक्तदान आणि नेत्रदान संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 204 जणांनी रक्तदान केले आणि 39 जणांचा नेत्रदान संकल्प शिबिरात सहभाग घेतला . चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीच्या मुख्य प्रवेशव्दारासमोरील एसकेएफ सभागृहात शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी अॅड. चांडक बोलत होते.
अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरुडे, राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, नगरसेवक शितल शिंदे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, सेवा विकास बँकेचे संचालक नरेंद्र ब्राम्हणकर, चंद्रशेखर आहिरराव, सप्तशृंगी नागरी पतपेढीच्या संचालिका विजया अमृतकर, प्रमिला शिनकर, संस्थेचे पिंपरी-चिंचवड महानगर शाखाध्यक्ष विजय शिनकर, रत्नप्रभा धुळकर आदी या वेळी उपस्थित होते.
अॅड. एस. बी. चांडक म्हणाले की, आजवर आपण कृत्रीम रक्ताची निर्मिती करु शकलेलो नाही हे एक सत्य आहे आणि हे सत्य जगभरातील वैज्ञानिकांना नेहमीच आव्हान देत आहे. अपघातात जखमी झालेल्या किवा कोणत्याही आजारवर छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करतांना कोणाला रक्ताची गरज भासल्यास ते दुसरया कोण्या व्यक्तीकडुनच घ्यावे लागते, आणि हया गोष्टीचा थेट संबध त्या व्यक्तीच्या जीवन मरणाशी असतो म्हणुनच तर रक्तदानाला विशेष महत्व आहे आणि ते आजच्या युगात रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे.
वाणी समाज प्रबोधन संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरुडे म्हणाले की, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहेच याच बरोबर डोळा हा देखील मानवी शरीराचा मुख्य अवयव आहे. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग बघता येत नाही. जगात डोळ्याचे त्रास वाढून अंध लोकंची संख्या खूप वाढत आहे. त्यामुळे शक्य असेल तर प्रत्येक लोकांनी मूत्यू नंतर नेत्र दान केले पाहिजे, कारण मूत्यू नंतर नेत्र दान कोणाला तरी उपयोगी पडून त्याचे अंधत्व दूर होऊ शकेल. निसर्गाची अद्भूत किमया अंधानाही पाहता यावी यासाठी मानवतेच्या दृष्टीकोणातून आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान करावे असे आवाहन शिरुडे यांनी केले.
प्रा. उदय पाटकर यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.