सैनिक टाकळी । प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
आपले जीवन जगत असताना समाजाचे काही तरी आपण देणे लागतो ही भावना प्रत्येकाने मनी जोपासली तर समाजाची उन्नती होईल , असे मत आयबीएम कॉम्प्युटरचे अनिल शेटे यांनी व्यक्त केले.
टाकळी येथील गर्ल्स हायस्कूलला कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूल कल्याण मधील एस एस सी १९८५ च्या वतीने संगणक भेट समारंभ कार्यक्रमामध्येते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरोळ तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव एस वाय पाटील, संचालक रामचंद्र पाटील, पी.जी.पाटील या वेळी उपस्थित होते.
राजेश पाटील म्हणाले कि, ग्रामीण भागातील शाळा चालवत असताना अशा दातृत्ववान लोकांची गरज भासते अशीच कृती या लोकांच्या कडून समाजासाठी भविष्यात होत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूल कल्याण च्या १९८५ च्या बॅच च्या वतीने चार संगणक मुख्याध्यापिका श्रीमती मुल्ला यांच्याकडे प्रदान करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत कोजीमाशी चे उपाध्यक्ष ए टी काटकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले . कार्यक्रमास आनंदा जोशी सुनील खरे सुधीर निरगुडे अजित आठवले अनिल चुंबके नीता महात्मे ,एस बी पाटील, रणजीत वासमकर, ए एस पाटील यांचेसह विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबुपे तर आभार आरडी यादव यांनी मानले.