निर्भीड न्यूज –
– जागतिक पर्यावरणदिनानिमित्त पिंपळे सौदागर येथे वृक्षारोपण
जगदगुरु संत तुकोबारायांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ ह्या संदेशाप्रमाणे निसर्गचक्र व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल तर झाडे लावणे व जगविणे आवश्यक आहे. झाडे लावण्याबरोबर झाडे जगवली तरच आपण पर्यावरनाचे रक्षण करू असे मत राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी जागतिक पर्यावरणदिनानिमित्त पिंपळे सौदागर येथे व्यक्त केले. राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
अर्जुन काटे, विलास काटे, गणेश काटे, सोपान साखरे, गुलाबराव काटे, पोपट जगताप, शंकर काटे, प्रकाश काटे, शंकर चोंधे, दिलीप काटे, बाळासाहेब काटे, संदेश काटे, आदी या वेळी उपस्थित होते.
यावेळी विठ्ठल ऊर्फ नाना काटे म्हणाले कि आत्तापासूनच आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीने कंबर कसणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक एक वृक्ष लावले पाहिजे. आपल्याला कोणतीही व्यक्ती येऊन आपल्याला वृक्षरोपण करण्या विषयी मार्गदर्शन करणार नाही. नागरिकांना आणि शाळेतील विध्यार्थीन मध्ये पर्यावरणाचे धडे व जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. त्या मुळे ‘वृक्ष लावा, जिवन वाचवा’ असा संदेश हि काटे यांनी दिला.