राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई – होळी सणासाठी उत्तर भारतीयांनी मुंबईत पाण्याचा अपव्यय केला तर आधी त्यांना समजावा तरीही त्यांनी ऐकले नाही तर त्यांची धुलाई करा असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.
ठाण्यात आयोजित एका बैठकीत राज यांनी उत्तर भारतीयांवर निशाणा साधला आहे. मुंबईसह राज्यभर सध्या पाण्याची टंचाई असून दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रामुख्याने उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर साजऱ्या होणाऱ्या होळी या सणाच्या दिवशी मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीय नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या असून ते म्हणाले, होळीच्या दिवसात पाणी बचतीसाठी उत्तर भारतीयांना हात जोडून विनंती करा. ‘लोकांना कोरड्या रंगात होळी खेळायला सांगा. त्यानंतरही त्यांनी पाण्याची नासाडी केलीच तर, तर मनसे स्टाईल्स हिसका दाखवा.’ उत्तर भारतीय ज्याप्रमाणे धुमधडाक्यात त्यांचे उत्सव साजरे करतात त्याप्रमाणे आपले मराठी सणही दणक्यात साजरे व्हायला हवेत असे सांगताना राज यांनी यावेळी मराठी सणांची यादीच आपलय कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केली. यामध्ये गुढीपाडवा, टीळक जयंती, सावित्रीबाई फुले जयंती आदी सणांचा उल्लेख करण्यात आला आहे.