निर्भीडसत्ता न्यूज –
दिघी ते भोसरी रस्त्यावर ममता चौकात दररोज वाहतूककोंडी होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागते. पुणे आणि पिंपरी-चिंचवडलाजोडणारा दिघीतील हा मुख्य चौक असून, गेल्या अनेक वर्षांपासून हा चौक वाहतूककोंडीचा सामना करत आहे. त्यामुळे या चौकात वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलिस आणि वाहतूकवॉर्डनची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नगरसेविका हिराबाई घुले यांनी विश्रांतवाडी वाहतूक पोलिस निरीक्षकाकडे केली आहे.
यासंदर्भात नगरसेविका हिराबाई घुले यांनी विश्रांतवाडी वाहतूक पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पुणे-आळंदी हा पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहराला जोडणारा मुख्यरस्ता आहे. या रस्त्यापासून भोसरीकडे जाताना ममता चौक हा दिघीतील मुख्य चौक आहे. पिंपरी-चिंचवडमधून लोहगाव विमानतळाकडे जाणारे प्रवासी या मुख्य चौकातून पुढे आळंदी-पुणे रस्त्याने प्रवास करतात. विश्रांतवाडी, विमाननगर, वाघोली या भागातील हजारो नागरिक पिंपरी-चिंचवड आणि चाकण भागातील एमआयडीसीमध्ये कामाला जाण्यासाठी याचचौकातून ये-जा करतात.
त्यामुळे हा रस्ता प्रमुख रहदारीचा रस्ता झाला आहे. दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात. मात्र या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना दिघीतील ममता चौकात ब्रेक लागत आहे. या चौकात वाहतूककोंडी ही नित्याचीच झाली आहे. वाहनचालकांसोबत या भागातील नागरिकांनाही वाहतूककोंडीतून मार्ग काढावे लागत आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिक यांनादररोज मनस्ताप होत आहे. ममता चौकात वाहतुकीला शिस्त लावणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यामुळे या चौकात दोन वाहतूक पोलिस आणि दोन वाहतूक वॉर्डनची कायम नियुक्तीकरावी आणि वाहनचालक व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.”
यावेळी नगरसेविका निर्मला गायकवाड, नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले आदी उपस्थित होते.