निर्भीडसत्ता न्यूज –
निवडणुकीतीलपराभवानंतर राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दुकानदारीबंद झाली आहे. मात्र ही दुकानदारी सुरूच राहावी, यासाठी विरोधी पक्षनेते योगेश बहलआणि नगरसेविका मंगला कदम यांचाआटापिटा सुरू आहे. मात्र भाजपनेया दुकानदारीला पूर्णपणे चापलावला आहे. आता या दोघांचेहीडोळे पांढरे होतील एवढा मोठाघोटाळा लवकरच उजेडात येणारआहे. त्यामुळेच बहल व कदमजोडगोळी बिथरली आहे. त्यातूनआलेल्या नैराश्येतूनच सर्वसाधारणसभेत मंगला कदम यांनीमहापौरांविषयी खालच्यापातळीवरची भाषा केली. भाजपने राष्ट्रवादीच्या प्रत्येक भ्रष्टाचाराचे पुरावे दिले आहेत. एसआरए,बचतगट महासंघ, गॅस शवदाहिनी आणि विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदी घोटाळ्यात पुराव्यामुळेच कारवाई झाली. भ्रष्टाचार सिद्ध झालाच नाही,असे म्हणणारे बहल यांनी शहरातील जनतेला मूर्ख समजून वक्तव्ये करू नयेत, असा टोला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी लगावला आहे.
यासंदर्भात सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महापालिकेला लुटून खाल्ल्यामुळे जनतेने निवडणुकीत राष्ट्रवादीला जागा दाखवून दिली. राष्ट्रवादीची महापालिकेतील दुकानदारी कायमची बंद झाली. ठेकेदार, बिल्डर आणि दलालांना हाताशी धरून प्रत्येक कामात राष्ट्रवादीने खाबुगिरी केली. मात्र आता सत्तागेल्यानंतरही आमची दुकानदारीसुरूच राहावी, असा राष्ट्रवादीच्यापदाधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे.त्यामध्ये विरोधी पक्षनेते योगेश बहल आणि मंगला कदम हे आघाडीवरआहेत. मात्र भाजपने या जोडगोळीच्या दुकानदारीला गेल्याचार महिन्यांत पूर्णतः चाप लावलाआहे. भ्रष्टाचाराचे पैसे येणे बंदझाल्यामुळे योगेश बहल आणिमंगला कदम हे बिथरले आहेत.
त्याचीच प्रतिक्रिया गुरूवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटली आहे. तसेच या दोघांचेही डोळे पांढरे होतील, असा एक मोठा घोटाळा लवकरच उजेडात येणार आहे. त्याची कुणकुण लागल्यामुळेच बहल आणि कदम या दोघांनीच सर्वसाधारण सभेत महापौर नितीन काळजे यांच्याशी भांडण करून एक प्रकारे भाजपवर दबावटाकण्याचे राजकारण केले. मात्र महापौर आपला संयम न सोडता विषयाला धरून बोलण्यासाठी यादोघांनाही वारंवार समज देत होते. तरीही मंगला कदमांनी महापौरांविषयी खालच्या पातळीवरची भाषा केली. माजीमहापौर राहिलेल्या कदम यांना हे शोभणारे नाही. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक आहेत आणि सभागृह तसेच सभागृहाबाहेरही त्यांचा मानराखण्याची आपली राजकीय संस्कृती आहे. मात्र महापालिकेतून पैसे मिळायचे बंद झाल्याने आलेल्यानैराश्येतून कोणी महापौरांचा अपमान करणार असेल, तर भाजपते कदापि सहन करणार नाही.
सत्ता असताना बहल आणि कदम याजोडगोळीने महापालिकेत काय कायउद्योग केले, हे त्यांच्याच पक्षाचेनगरसेवक व नगरसेविकांनीवेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊनजाहीरपणे सांगितले होते. याजोडगोळीमुळेच राष्ट्रवादीची सत्ताजाणार, असे भविष्यही त्यांच्याचपक्षाच्या नगरसेवकांनी वर्तविले होते. ते खरे ठरले. त्यामुळे आतासर्वसाधारण सभेत काही तरीस्टंटबाजी करायची आणि नंतरजनतेची दिशाभूल करणारे वक्तव्यकरून चर्चेत राहण्याचा उद्योग याजोडगोळीचा सुरू आहे. गुरूवारी सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या एकाही नगरसेवकांनी बहल व कदम यांना साथ दिली नाही, हे वास्तव आहे. बहल हे भाजपने भ्रष्टाचाराचेकेलेले आरोप सिद्ध झालेलेचनाहीत, असे सांगत आहेत. तसेअसेल तर त्यांचीच सत्ता असतानागॅस शवदाहिनी खरेदी आणि विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदी घोटाळ्याची चौकशी का झाली? याचे उत्तर बहलयांनी शहरातील जनतेला द्यावे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बोगसलाभार्थींना घरे दिल्याने फौजदारी कारवाई का सुरू झाली? हेही बहल यांनी स्पष्ट करावे. केवळदुकानदारीकडे लक्ष असणाऱ्या बहल यांना गॅस शवदाहिनी आणि विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदीत अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली, हे निश्चितपणे माहिती नसणार आहे. त्यामुळे बहल यांनी भाजपने केलेले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्धच झाले नाहीत, असा कितीही कांगावा केला तरी दिलेले पुरावे खोटे ठरणार नाहीत. महिलाबचतगट महासंघांना महापालिकेचे अनुदान लाटण्याच्या प्रकरणात योगेश बहल हे मुख्य सूत्रधार होते, हेते विसरले आहेत. योगेश बहल आणि मंगला कदम यांना शहरातीलजनता मूर्ख असल्याचा कायम भास होतो. मात्र याच जनतेने निवडणुकीत राष्ट्रवादीला मूर्ख बनविले, याचे तरीभान या दोघांनी ठेवावे. आपली दुकानदारी कायम राहावी, यासाठीया दोघांनीही कितीही स्टंटबाजी केली आणि वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी भाजपत्याला भीक घालणार नाही. या दोघांनीही संगनमताने केलेला प्रत्येक घोटाळा जनतेसमोर आणू, असा इशाराच त्यांनी दिला आहे.