राजाराम माने आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कडक करावाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
शिरोळ / प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
शिरोळ येथील राजाराम महादेव माने या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी़ व दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार उल्हास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे़. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी निवेदन देण्यात आले आहे.
शिरोळ येथील राजाराम माने या तरुणाने पैशाच्या तगाद्याला वेतागून विष प्राषण करुन आत्महत्या केली़ होती, काही दिवसांपासून राजाराम माने याला एका अज्ञात महिलेला फोन केलेच्या कारणावरन धमकावून संशयित आरोपी निखित उर्फ भाऊ खाडे व शशिकांत साळुंखे (रा़घालवाड) तसेच पोलीस खात्यामधील काही अधिकारी यांच्याकडून प्रकरण मिटविण्यासाठी वारंवार पैशाची मागणी होतअसल्याची अशी फिर्यादीत नोंद करण्यात आली आहे़.
सांगली जिल्ह्यातील कोथळे खून प्रकरण झाले असताना शिरोळ तालुक्यातील ही घटना पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणारी आहे़. या घटनेमुळे शिरोळ तालुक्यातील नागरीक संतप्त आहेत़. या प्रकरणाशी पोलीसांचा संबंध आहे़ या बातमीमुळे लोकांमध्ये असंतोष पसरला आहे़, याचा निषेध म्हणून गुरुवारी गांव बंद पाळण्यात आले. या प्रकरणाशी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही संबंध असल्याचे नागरीकांतून बोलले जात आहे़. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी़ आणि दोषींना कडक शिक्षा करण्यात यावी़ अशी मागणी आमदार उल्हास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे़.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी तातडीने पोलीस महानिरीक्षकांना चौकशीचे आणि दोषींवर कडक कारवाईच्या सूचना केल्या आहेत़. यावेळी जलसंधारण राज्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते़