निर्भीड न्यूज –
खान्देश अहिराणी कस्तुरी मंचतर्फे चिंचवड येथे रविवार, दि. 24 एप्रिल रोजी तिसरे एकदिवसीय राज्यस्तरीय अहिराणी कस्तुरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ग्रंथदिंडी, खान्देशी अहिराणी गाणी, विविध पुरस्कारांचे वितरण, परिसंवाद, कवी संमेलन, कथा कथन, यासह खान्देशी अहिराणी लोकगीतांचा कार्यक्रम या वेळी सादर करण्यात येणार आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात हे संमेलन होणार आहे.
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष जयकुमार रावल यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. अहिराणी अभ्यासक डॉ. उषा सावंत संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राहतील.
आ. लक्ष्मण जगताप, संजय भेगडे, महापौर शकुंतला धराडे, मराठी चित्रपट कलाकार पॅडी ऊर्फ पंढरीनाथ कांबळे, सुरत येथील युथ गुजरात फाऊंडेशनचे अध्यक्ष जिग्नेश पाटील, जळगावचे जिल्हाधिकारी भागवत सैंदाणे आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक वाहरु सोनवणे, खान्देश हित संग्राम संघटनेचे (कल्याण) अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
भाजपाच्या कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस नामदेव ढाके कार्याध्यक्ष आहेत. महाराष्ट्र जनसंग्राम सामाजिक संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे स्वागताध्यक्ष आहेत. खान्देश अहिराणी कस्तुरी मंचच्या संस्थापक विजया मानमोडे आमंत्रक आहेत. ज्येष्ठ साहित्यिक बापूसाहेब पिंगळे संयोजक समिती प्रमुख आहेत. अभिजित मानमोडे, वाय. डी. पाटील, एम. डी. पिंजारी संयोजक आहेत. भटुलाल बागुल आणि अनुपमा जाधव सूत्रसंचालन करणार आहेत.
धुळ्याचे आमदार कुणाल पाटील, अमळनेरचे शिरीष चौधरी, पाचो-याचे किशोर पाटील, धरणगावचे गुलाबराव पाटील, जळगावचे राजू भोळे, चोपडा येथील चंद्रकांत सोनवणे, सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आणि अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरुडे, जेष्ठ साहित्यिका चंद्रलेखा बेलसरे, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, भीमराव बाविस्कर, उद्योजक रवींद्र वारडे, धुळे येथील साई डी. एल. केबल नेटवर्कचे संचालक गुणवंत वाघ, धुळे महापालिका स्थायी समितीचे सभापती आणि शिवसेनेचे धुळे महानगरप्रमुख सतीश महाले, धुळे येथील अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाष अहिरे, जेष्ठ संगीतकार विश्राम बिरारी, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कृष्णाजी पाटील, अहिराणी चित्रपट निर्माते दत्ताराम चिंचोले, बांधकाम व्यावसायिक अशोक खिवंसरा, जेष्ठ मराठी साहित्यिक वा. ह. मगदूम, ग. स. बँकेचे चेअरमन चंद्रकांत देसले, सुरत येथील माजी नगरसेवक सुरेश सोनवणे, भारतीय बौध्द महासभेचे सुरत येथील शहरप्रमुख भीमराव सैंदाणे, धुळे येथील एच. बी. इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन व्यवस्थापक विनोद कणसे, शिरपूर येथील सारिका रंधे, जेष्ठ अहिराणी साहित्यिक जगदीश देवपूरकर, एरंडोल येथील जेष्ठ अहिराणी साहित्यिका शकुंतला रोटवदकर, जेष्ठ अहिराणी साहित्यिक रामदास वाघ, मालेगाव येथील अहिराणीचे जेष्ठ अभ्यासक डॉ. सयाजी पगार, नाशिक येथील तहसीलदार सुदाम महाजन, हडपसर येथील डॉ. ज्ञानेश्वर दुसाणे, चिंचवड येथील डॉ. अनिल बि-हाडे, चिंचवड येथील उद्योजक विजय पाटील आदी मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात रविवार, दि. 24 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहादरम्यान ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व कार्यक्रम प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात होणार आहेत. दहा वाजता गौराई, कानबाईची गाणी आणि स्वागतगीत होईल. साडेदहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर लागलीच अहिराणी कस्तुरी मासिकाच्या आखाजी विशेषांकाचे प्रकाशन होईल. साडेअकरा वाजता मान्यवरांचे मार्गदर्शनपर मनोगत आणि विविध पुरस्कारांचे वितरण होईल. दुपारी दोन वाजता अहिराणी साहित्य संस्कृतीचे जतन या विषयावर कथाकथन होईल. दुपारी तीन वाजता आमंत्रित कवींचे कवी संमेलन होईल. दुपारी साडेचार वाजता गप नही ते गफुडा अर्थात कथा कथन होईल. सायंकाळी साडेपाच वाजता ‘मन्हा खान्देश झोक’ हा अहिराणी लोकगीतांचा संगीत कार्यक्रम होईल. कल्याण येथील खान्देश हित संग्रामतर्फे हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता समारोप होईल.
अखिल भारतीय खान्देश कोहिनूर पुरस्कार दिवंगत पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांना (मरणोत्तर) प्रदान करण्यात येणार आहे. निर्माता-दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांना अहिराणी कस्तुरी ‘कलागौरव’ पुरस्कार, धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना अहिराणी कस्तुरी ‘खान्देश सेवाव्रती’ पुरस्कार, नंदुरबार येथील खासदार डॉ. हिना गावीत यांना अहिराणी कस्तुरी ‘खान्देश हिरकणी’ पुरस्कार, जेष्ठ अहिराणी साहित्यिक देविदास ऊर्फ बापूसाहेब हटकर यांना अहिराणी कस्तुरी ‘साहित्यरत्न’ पुरस्कार, सुरतच्या आमदार संगीता पाटील यांना अहिराणी कस्तुरी ‘खान्देश गौरव’ पुरस्कार, उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील अधीक्षक मोहन वर्दे यांना अहिराणी कस्तुरी ‘विशेषसेवा’ पुरस्कार, पुणे येथील उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना अहिराणी कस्तुरी ‘विशेषसेवा’ पुरस्कार, ‘जनशक्ती’चे संपादक उद्योजक कुंदन ढाके यांना अहराणी कस्तुरी ‘खान्देशरत्न’ पुरस्कार, जेष्ठ उद्योजक हिरालाल चौधरी यांना अहिराणी कस्तुरी ‘खान्देश भूषण’ पुरस्कार, देऊळबंद या मराठी चित्रपटाचे निर्माते उद्योजक कैलास वाणी यांना अहिराणी कस्तुरी ‘कलारत्न’ पुरस्कार, उद्योजक दीपक पाटील यांना अहिराणी कस्तुरी ‘उद्योगरत्न’ पुरस्कार, जळगावचे खासदार ए. टी. पाटील यांना अहिराणी कस्तुरी ‘आदर्श लोकसेवा’ पुरस्कार, ‘माय गीताई’ हा पहिला अहिराणी ग्रंथ लिहिणारे साहित्यिक सुरेश पवार यांना अहिराणी कस्तुरी ‘खान्देशरत्न’ पुरस्कार, खान्देशात मतीमंद आणि मूकबधीर मुलांसाठी कार्य करणारे भैय्यासाहेब पाटील यांना अहिराणी कस्तुरी ‘खान्देशरत्न’ पुरस्कार, चाळीसगाव येथील आमदार उन्मेश पाटील यांना अहिराणी कस्तुरी ‘समाजव्रती’ पुरस्कार, जेष्ठ नाटककार-गायक शिवदास जोंधळे यांना अहिराणी कस्तुरी ‘कलारत्न’ पुरस्कार, अहिराणी कलाकार पुष्पा ठाकूर यांना अहिराणी कस्तुरी ‘कलागौरव’ पुरस्कार, जेष्ठ अहिराणी साहित्यिक बापूसाहेब पिंगळे यांना अहिराणी कस्तुरी ‘खान्देशरत्न’ पुरस्कार, जेष्ठ अहिराणी साहित्यिक एम. के. भामरे यांना अहिराणी कस्तुरी ‘समाजरत्न’ पुरस्कार, कल्याण येथील खान्देश हित संग्राम संघटनेचे प्रवक्ता सुरेश पाटील यांना अहिराणी कस्तुरी ‘समाजरत्न’ पुरस्कार, पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार-कवी दीपेश सुराणा यांना अहिराणी कस्तुरी ‘समाजरत्न’ पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात येणार आहे.
अहिराणी साहित्य संस्कृतीचे जतन या विषयावर परिसंवाद होणार आहे. अमळनेर येथील जेष्ठ साहित्यिक प्रकाश पाटील अध्यक्षस्थानी राहतील. अहिराणी चित्रपट निर्माता आणि कलाकार योगेश कुलकर्णी, जेष्ठ साहित्यिक देविदास ऊर्फ बापूसाहेब हटकर, अहिराणी साहित्य समीक्षक डॉ. प्रा. फुला बागुल, जेष्ठ साहित्यिक सुरेश पाटील, अहिराणी साहित्यिक ललिका चौधरी यात सहभागी होणार आहेत.
आमंत्रित कवींकडून काव्य वाचन होणार आहे. डॉ. प्रा. संजीवकुमार सोनवणे अध्यक्षस्थानी राहतील. प्रदीप शिरसाट सूत्रसंचालन करणार आहेत. म्हसावद येथील विमल वाणी, झोडगे येथील कमलाकर देसले, खान्देशातील चिंचावड येथील शैलेश चव्हाण, साक्री येथील रावसाहेब कुंवर, अमळनेर येथील नाना खेडेकर, नाशिक येथील सुनिता पाटील, धुळे येथील सदाशिव सूर्यवंशी, शिरपूर येथील तुषार पाटील, मालेगाव येथील नाना महाजन, पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार पितांबर लोहार, धुळे येथील मंगला रोकडे, पुणे येथील नाना माळी, शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील ज्ञानेश्वर भामरे, पुणे येथील रघुनाथ पाटील, पिंपरी-चिंचवड येथील संजय साळुंखे, धुळे येथील शाहीर श्रावण वाणी, नाशिक येथील अनुराधा धोंडगे आदी या वेळी कविता वाचन करणार आहेत.
गप नही ते गफुडा अर्थात कथा कथनही या वेळी होणार आहे. कल्याण येथील बापूसाहेब हटकर अध्यक्षस्थानी राहतील. कजगाव येथील सुनील गायकवाड, शिरपूर येथील बापूसाहेब भामरे, धुळे येथील भगवान पाटील, नाशिक येथील आशा देवळीकर, धरणगाव येथील प्रा. बी. एन. चौधरी यात सहभाग घेणार आहेत.
पंकज निकम, शरद पाटील, प्रमोद शिरसाळे, संघपाल तायडे, रविंद्र महाजन, संजय साळुंखे, गौतम बागुल, वाल्मीक सोनवणे, राजेश नेतकर, भटू पाटील, रोहीत मानमोडे, महेंद्र पाटील, मधुकर सोनवणे, डॉ. मनोहर भदाणे, मोतीलाल पाटील, योगेश जाधव यांचा संयोजन समितीत समावेश आहे.
पुणे येथील छाया भदाणे, नाशिक येथील डॉ. आशा देवळीकर, नागपूर येथील वंदना वानकर, चाळीसगाव येथील कुमारी संघमित्रा वानखेडे, पुणे येथील चंदा पिंगळे, चिंचवड येथील देवयानी पाटील, कल्याण येथील संगीता हटकर, नाशिक येथील अनुराधा धोंडगे, पुणे येथील शोभा पारे, नाशिक येथील विनोद शिंदे, चाकण येथील अशोक माळी, शिरपूर येथील पराग भदाणे, कल्याण येथील चेतन पाटील, जळगाव येथील योगेश सूर्यवंशी, आकुर्डी येथील राहुल सोनवणे आणि धुळे येथील वैशाली आहिरे यांचा स्वागत समितीत समावेश आहे.