निर्भीड न्यूज –
आई – वडील व संत गुरुंच्या मार्गदर्शनाने मानवाच्या जीवनाला दिशा मिळते. जीवनाचा अर्थ आई वडिलांकडून कळतो, तर अध्यात्माचे महत्व संतांकडून कळते. संतांच्या हृदयात स्थान मिळविण्यासाठी पात्रता प्राप्त करावी लागते. ही पात्रता साधना करुन मिळविता येते. म्हणूनच जैन धर्मात तपाला, साधनेला महत्व आहे. जीवनातील कठीणसमयी आपणाला संत खरा मार्ग दाखवितात, अपमान करणे स्वभावात असते; परंतु सन्मान करणे संस्कारात असते. संस्कारीत व्यक्ती कधीही व्यसनाच्या आहारी जात नाही, असे मार्गदर्शन जिनशासनसौरभ पूज्या डॉ. श्री मंजूश्रीजी महाराज यांनी वर्षीदान कार्यक्रमाच्या प्रवचनप्रसंगी चिंचवड येथे केले.
पूज्य श्री अक्षयश्रीजी आखा महाराज, ध्यानसिध्दा के प्रणेता श्रमणी अक्षयश्री आखाजी म.सा., जिन-तिर्थ-सर हंसिका महासती श्री मल्लीश्री म.सा., कलाप्रिय महासती श्री संबोधीश्री म.सा., सर्वजनप्रिय साधिका संसिध्दी आलीजी म.सा., शांत स्वभावी महासती कल्याणीजी म.सा., स्वागत अध्यक्ष मोहनलाल संचेती, कल्याण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष पोपटलाल नाहर, महामंत्री प्रवीण पोकरणा, कोषाध्यक्ष पोपट बरडीया, कौशल विनोद जैन, राजेंद्रकुमार मुनोत, हरकचंदजी लुंकड, सुरजबाई चोरडीया, विमलबाई संचेती, अशोक बागमार, गणेश चोरडीया, प्रवीण पोकरणा, संजय जैन, दिक्षार्थी घेलाणी परिवार, परेश नाहर, माणिक मुथा, संदीप कांकरीया, डॉ. प्रताप कोठारी, चंद्रकांत लुणावत, राहुल रांका, मदन कांकरीया, लिलावती लुणावत, सुनीता मुथा, प्रमोदलाल भंडारी, कुसुम भंडारी, परेश नाहर, सरला नाहर आदींसह शेकडो जैन बंधू भगिनी उपस्थित होते.
पूज्या डॉ. श्री मंजूश्रीजी महाराज साहेब म्हणाल्या की, तपस्वी साधू-संत तपस्येने आत्म्याची शोभा वाढवितात. अपेक्षेशिवाय तप करा, तपाने आलेल्या आत्मिक शक्तीमुळे सर्वसाधारण व्यक्ती संकटातदेखील सहज मार्ग शोधू शकतात. ‘तन, मन, वाणी’वर विजय मिळवून शुद्ध विवेक बुद्धीने शुभ कार्याकडे सकारात्मकतेकडे वळविले की, आत्मकल्याणाचा मार्ग सापडेल.