निर्भीडसत्ता न्यूज –
मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न बघता अधिवेशन बोलावण्याची आमची भूमिका आहे. आरक्षणाबाबात ज्या-ज्या समाजाच्या मागण्या आहेत, त्या सर्व मागण्यांचा एकत्रित विचार करुन त्याबाबत एकमातने निर्णय घ्यावा.
सरकारने मराठा समाजासोबत इतरही समाजाच्या मागण्यांचा एकत्रित विचार करावा.
उद्धव ठाकरे म्हणाले, मराठा समाजाने आक्रमकता सोडून द्यावी, तसेच कुठेही हिंसाचार करु नये, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांना केले आहे.
सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, त्यासाठी शिवसेनेचे सर्व मंत्री आणि आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.