निर्भीडसत्ता न्यूज –
सुक्ष्म, लघु, उद्योगाला 59 मिनिटात एक कोटींचे कर्ज देण्याची वचन देतात. हे कदापी शक्य नसून आगामी निवडणुकीसाठी भाजप नेत्यांचे हे गाजर आहे. एकदा का सत्ता हातात आली मग जाहिरपणे म्हणतात हा चुनावी जुमला होता, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधा-यांवर टिका केली. आता 25 तारखेला शिवसेनेचे नेते अयोध्येला निघालेत. निवडणुका जवळ आल्या की, भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांना राम आठवतो, असेही पवार म्हणाले.
शिवसेना भाजपावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका करतेय, तरी भाजप नेते शांत आहेत. त्यांना का प्रत्युत्तर दिले जात नाही. किंवा कारवाई का होत नाही. कारण, शिवसेनेशी युती केल्याशिवाय सत्ता आणले शक्य नसल्याचे भाजप नेत्यांना माहिती आहे. म्हणूनच सेनेच्या विरोधात बोलायला भाजपचा एकही नेता धजावत नाही. गुजरामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बांधण्यामागे भाजपाचे राजकारण आहे. सरदार पटेल हे खरेतर काँग्रेसचे नेते होते. पोलादी व्यक्तीमत्व म्हणून त्यांना इंदिरा गांधी यांनी उपाधी दिली होती. त्यांचा पुतळा करण्याच्या पाठीमागे भाजपचे हीत लपले आहे. निवडणूक जवळ आल्यावर राममंदिराचा मुद्दा काढला. समाजात धृवीकरण करायचय. निवडणुका आल्या की शिवसेना, भाजपाला राम आठवतो, असेही पवार यांनी पिंपरीतील पत्रकार परिषदेत शनिवारी (दि. 3) सांगितले.