कराड | प्रतिनिधी
पोलिसांना 126 कायद्याची अमंलबजावणी करावी लागत आहे. गुन्हा मोठा असो की छोटा तो गुन्हा असतोच, त्यावर कारवाई करावी लागतेच. सध्या सोशल मिडिया मुलींसाठी धोकादायक आहे. वय 14 ते 18 वर्षाच्या दरम्यान मुलींना अमिषे, फसवणुकीचे प्रमाण 30 टक्के गुन्हे घडले आहेत. तेव्हा सोशल मिडियाचा वापर काळजीपूर्वक करण्याचे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.
येथील कराड अर्बन बॅकेच्या सभागृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, उपअधिक्षक धीरज पाटील, कराड तालुका पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर, वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोखंडे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.