निर्भीडसत्ता न्यूज- भारतीय क्रिकेट संघाला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. मात्र, हा पराभव विसरून आता भारतीय संघाला पुढे जावे लागणार आहे. कारण, २०१९-२०२० या मोसमात भारतीय संघाला पुन्हा एकदा भरपूर क्रिकेट खेळायचे आहे. भारताची सुरुवात विंडीज दौऱ्याने होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ मायदेशातच खेळणार आहे. यादरम्यान घरच्या मैदानावर भारतीय संघ ५ कसोटी, ९ वनडे आणि १२ टी-२० सामने खेळणार आहे. भारताचा पुढील परदेश दौरा २०२०मध्येच असेल.