लातूर : महाराष्ट्रात विशेष करून मराठवाड्यात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाण्यासाठी जनक्षोभ उसळू नये म्हणून प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजण्यास सुरूवात केली आहे. लातूर जिह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाक्या आणि टॅंकर भरण्याच्या ठिकाणी 10 मेपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे.
दुष्काळ आणि पाणीटंचाईची समस्या मराठवाडयात सर्वाधीक आहे. मराठवाडयात फक्त 8 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक ठिकाणी जनसामान्यांना पाण्यासाठी वणवण करत फिरावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पाण्यासाठी आंदोलन होण्याची भीती लक्षात घेऊन लातूर जिह्यात 20 ठिकाणी जमावबंदी आदेश देण्यात आला आहे. तसेच टंचाई निवारणासाठी उपायोजना करण्यात येत आहेत.