निर्भीडसत्ता न्यूज –
केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत २४ तास पाणीपुरवठा प्रकल्प राबविला जात आहे. त्यातील आणखी ५४ कोटी रुपयांच्या कामाला स्थायी समितीने बुधवारी (दि. २९) मंजुरी दिली. त्यामध्ये प्रामुख्याने आकुर्डी, चिखली, जाधववाडी, रुपीनगर, तळवडे या भागाचा समावेश आहे.
केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत २४ तास पाणीपुरवठा प्रकल्प राबविला जात आहे. त्यातील आणखी ५४ कोटी रुपयांच्या कामाला स्थायी समितीने बुधवारी (दि. २९) मंजुरी दिली. त्यामध्ये प्रामुख्याने आकुर्डी, चिखली, जाधववाडी, रुपीनगर, तळवडे या भागाचा समावेश आहे.
सिमा सावळे स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. अमृत योजनेअंतर्गंत शहराच्या उर्वरित ६० टक्के भागाला २४ तास पाणीपुरवठा देण्याचा प्रकल्प सुरू आहे. त्यासाठी चार टप्प्यात कामे करण्यात येत आहे. त्यापैकी एकूण ११२ कोटी रुपयांच्या दोन कामांना मागील आठवड्यात मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर तिस-या आणखी ५४ कोटी ३३ लाख ३४ हजार रुपयांच्या खर्चाला बुधवारी मंजुरी दिली.
त्यामध्ये आकुर्डी, चिखली, जाधववाडी, रुपीनगर या भागातील पाणी गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. तर, सर्वांना पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. हे काम मे. पी. पी. गोगड या ठेकेदाराला देण्यात आले आहे. या चार कामांपैकी आणखी एका कामाची निविदा प्रक्रिया राहिलेली आहे. ती पुर्ण झाल्यानंतर संपूर्ण शहरासाठी २४ तास पाणी प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यामुळे हे प्रकल्प पुर्ण झाल्यावर शहराला २४ तास पाणी मिळेल, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.