निर्भीड न्यूज –
महिला स्वावलंबी झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकते. त्यासाठी महिलांनी संघटीत होऊन बचतगटांच्या माध्यमातून सक्रीय झाले पाहिजे, असे मत नगरसेविका नीता पाडाळे यांनी व्यक्त केले.
काळेवाडी येथील कृष्णा रेसिडेन्सी येथे राधाकृष्ण महिला बचत गट आणि जोतिबानगर येथील अश्विनी कॉलनी येथे धैर्या महिला बचत गट स्थापन करण्यात आला. नगरसेविका नीता विलास पाडाळे आणि सिनेअभिनेत्री रश्मी खेडेकर यांच्या हस्ते या बचतगटांचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी नगरसेविका पाडाळे बोलत होत्या.
राधाकृष्ण बचतगटाच्या अध्यक्षा शोभा खरात, उपाध्यक्षा नंदा बर्वे, क्रांती सपकाळ, अर्चना यादव, विद्या शिंदे, बालिका गोयेकर, सुनिता बोत्रे, सुवर्णा कांबळे, चेतना माहुरे, यासमीन तांबोळी, माधवी पवार, सुवासिनी आढाव यांच्यासह बचत गटाच्या पदाधिकारी या वेळी उपस्थित होत्या.
नगरसेविका पाडाळे या वेळी म्हणाल्या की, आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी महिलांनीही प्रयत्न केले पाहिजेत. संघटनातून हे सहज शक्य आहे. महिलांनीच एकत्रीतरित्या काम करून एकमेकींना साह्य केले पाहिजे.
क्रांती सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले. शोभा खरात यांनी आभार मानले.