पुणे | राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा आज म्हणजेच 18 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. राज्यभरात एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी ही परिक्षा देत आहेत. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण 15,05,027 विद्यार्थ्यांपैकी 8,43,552 विद्यार्थी तर 6,61,325 विद्यार्थिनींचा समावेश आहे. राज्यभर एकूण 3,036 परीक्षा केंद्रे आहेत.
आज बारावीची परिक्षा सुरू होत आहे. 18 मार्चपर्यंत परिक्षा सुरू राहणार आहे. विज्ञान, वाणिज्य, कला आणि एमसीव्हीसी विभागाचे विद्यार्थी परीक्षेमध्ये सहभागी होतील. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत परिक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट आणि आयडी कार्ड परीक्षा केंद्रांवर घेऊन यावे. परीक्षेच्या आधी अर्धा तास परीक्षा केंद्रात उपस्थिती राहणे आवश्यक असणार आहे.
मुस्लिम मुली बुर्खा परिधान करुन बसू शकतात
दहावी व बारावी परीक्षेला मुस्लिम मुली बुर्खा परीधान करुन परीक्षेला बसु शकतात असे आदेश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने काढला आहे. याबाबतच्या सुचना राज्यातील विभागीय परीक्षा मंडळांना दिल्या आहेत. त्याच बरोबर परीक्षा केद्रावर या मुलीची तपासणी करण्याचे अधिकार महीला पोलीस अधिकारी व महीला शिक्षकेला दिला आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे राज्यातील परीक्षार्थी मुस्लिम मुलीना दिलासा मिळाला आहे.