मुंबई | भाजप नेते आणि देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सर्कस म्हणून संबोधलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत त्यांचा समाचार घेतला आहे.
आमच्या सर्कसमध्ये सर्व प्राणी आहेत, विदुषकाची कल्नाही आहे. पण विदुषकाची मात्र कमतरता आहे, या शब्दांत त्यांनी राजनाथ सिंहांना उत्तर दिलं आहे. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कोकणातील काही गावांना शरद पवार यांनी भेट देऊन नुकसानी पाहणी केली, यानंतर ते बोलत होते.